19 April 2025 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
x

तेलंगणातील राज्यस्तरीय शेतकरी 'रयत बंधू योजनेचा' केंद्राकडून राष्ट्रीय स्तरावर विचार होणार?

हैदराबाद: मागील काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हिंदी पट्ट्यातील ३ महत्वाची राज्य गमवावी लागली होती. दरम्यान, या ३ प्रमुख राज्यांमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या नाराजीचा सर्वात मोठा फटका बसल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, असे असले तरी तेलंगणात मात्र काँग्रेस, टीडीपी आणि भाजप असे मोठे प्रतिस्पर्धी समोर असताना सुद्धा टीआरएस’ला अभूतपूर्व यश प्राप्त झालं होतं.

टीआरएसच्या यशामागील मूळ कारण होतं ते ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून मिळालेला प्रतिसाद हे समोर आलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांनी भव्य आंदोलन केलं होतं. परंतु, त्यामध्ये तेलंगणाच्या शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता. कारण तेलंगणातील केसीआर सरकारनं ‘रयत बंधू’ योजना राबवल्यानं शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला होता. याच योजनेच्या यशामुळे टीएसएस’ने तेलंगणातील मोठा विजय प्राप्त केला होता. परंतु, दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशातील असलेली सत्ता सुद्धा गमवावी लागली. त्याला मूळ कारण होतं ते ग्रामीण भागात पडलेला फटका आणि शेतकऱ्यांचा रोष हीच कारण होती.

आता मोदी सरकार तेलंगणाच्या पॅटर्न अमलात आणण्याचा विचार करत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एकरामागे काही विशिष्ट रक्कम देण्याचा विचार केंद्राकडून केला जात आहे. नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळामुळे बळीराजा सध्या मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळे बळीराजाला विश्वास देऊन खुश करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीआधी केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेची प्रेरणा मोदी सरकारला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून मिळाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या