20 April 2025 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाच्या तोंडात दोन घास गेले तर मला आवडेल : नाना पाटेकर

खडकवासला : राज्याचा ग्रामीण भाग सध्या प्रचंड दुष्काळाने ग्रासला आहे आणि मराठवाड्यात तर परिस्थिती फारच कठीण आहे. त्यामुळे मराठवाड्यात जर एक मूठ धान्य व एक पेंडी चारा सर्वांनी दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि होरपळणाऱ्या माणसांना मोठा हातभार लागेल. केवळ नाइलाजास्तव ग्रामीण भागातील लोकं आज मोठ्याप्रमाणावर शहरात येत आहेत, ती काही भिकारी नाहीत. त्यामुळे त्यांना भिक्षुकांसारखी वागणूक अजिबात देऊ नका, असे जाहीर आवाहन नाना पाटेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले.

देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत सुद्धा भव्य शेतकरी मोर्चा निघाला. त्यामुळे हे सर्व पाहता शेतकऱ्यांना संस्थांनी सुद्धा सढळ हाताने मदत करावी. कोणतेही सरकार मदत करत असते परंतु ती नेहमीच कमी पडते आणि त्यामुळे सामाजिक संस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन मदत करायला हवी असे सुद्धा नाना पाटेकरांनी मत व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाचं पाटबंधारे खातं आणि ग्रीन थंब या समाजसेवी संस्थेच्या एकत्रित उपक्रमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे आज उद्घाटन करण्यात आले त्यावेळी नाना पाटेकरांनी उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान, या कार्यक्रमाला अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी नाम फाऊंडेशनकडून ५ पोकलन या सुद्धा या स्तुत्य उपक्रमासाठी मोफत देण्यात आले. आपण निसर्गाशी छेडखनी केल्यास आपल्याला निसर्ग सुद्धा आपल्याला तेच देणार अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी नाना पाटेकरांनी प्रश्न विचारण्यात आला की, ‘आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते’, परंतु दुष्काळावर अजिबात चर्चा होत नाही. त्यावर नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं की, “कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे, मात्र मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल, त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर तुम्ही खुशाल बांधा. पण मला स्वतःला जे काम करायचे आहे ते मी करत आहे, असे उत्तर नाना पाटेकरांनी दिले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nana Patekar(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या