22 February 2025 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे

मुंबई : कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले. कोकण संदर्भातील सर्वच प्रश्नांवर शिवसेनेची नेहमीच दुपट्टी भूमिका करत आली आहे. केवळ पैशांसाठी संपूर्ण कोकणच भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला.

रत्नागिरीत होणाऱ्या नाणार ग्रीन रिफायनरीला कोकणात आणण्याचा घाट हा शिवसेनेनेच घातला असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसेवा नारायण राणे यांनी केला आणि नाणार ग्रीन रिफायनरीला आपला तीव्र विरोध असल्याचेही नमूद केले.

आम्ही कोणत्याही परिस्थितीत नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही आणि अधिकाऱ्यांनी कोणताही दम देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करू. मी मुख्यमंत्री फडणवीसांना ही संदर्भात भेटणार असून त्या व्यतिरिक्त ही मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहित आहे. कोणत्याही परिस्थितीत मी हा प्रकल्प होऊ देणार नाही असे ही नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.

कोकणात एकूण १३ हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे आणि या भागात जवळ जवळ ७ लाख आंब्याची झाडं असून प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रात येत. १८ गावांतील जनतेचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध शिवसेना केवळ दुपट्टी भूमिका घेऊन केवळ पैशांसाठी संपूर्ण कोकणच भस्मसात करण्याचा घाट घालत आहे. या रिफायनरीतून होणाऱ्या सांडपाण्यामुळे मासेमारीच खूप मोठा नुकसान होणार असल्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली.

जर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंचा या प्रकल्पाला विरोध होता तर राज्याचे ‘उद्योगी’ मंत्री आणि केंद्रातील अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच असताना त्यांच्या प्रकल्पांना मान्यताच कशी मिळाली आणि जमीन अधिग्रहनाला मान्यता का दिली असा प्रश्न ही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून दम दिला जात आहे आणि त्यांना वारंवार धमक्याही येत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या आहेत. तुझ्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा मिळेल असं पत्र ही अशोक वालम यांना देण्यात आलं.

या ठिकाणी खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्या असल्याची माहित ही आपल्याकडे आहे असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. इतकंच काय तर शिवसेनेचे पदाधिकारी इथे दलाली करत फिरताना दिसत आहेत असं ते पुढे म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x