23 February 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

बाळासाहेबांचं स्मारक ५ वर्षे का रेंगाळले या प्रश्नामुळे उद्धव यांना मिरची झोंबली: अजित पवार

मुंबई : सामनातून झालेल्या टीकेतून शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती. परंतु उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील खूप महत्वाचे नेते आहेत. पण त्यांचे स्मारक तब्बल पाच वर्षे का रेंगाळले? हा माझा प्रश्न काही चुकीचा नव्हता. केवळ स्पष्ट बोलल्यामुळे उद्धव ठाकरेंना कोल्हापुरी मिरची झोंबली, असा सणसणीत टोला अजित पवार यांनी सामनातील अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शिवराळ भाषेत शिवसेनेकडून करण्यात आलेले प्रतिक्रिया म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला.

दरम्यान, स्वतःच्या पहिल्या प्रतिक्रियेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागात बाप असा शब्दप्रयोग केला जातो, तर शहरी भागात वडील असा उल्लेख केला जातो. त्यामुळे माझा शब्दप्रयोग योग्यच आहे. मी केवळ चांगल्या भावनेनेच माझी भूमिका मांडली होती. पण सत्य बोचल्याने उद्धव ठाकरेंना मिरच्या झोंबल्या आहेत. परंतु, शिवसेनेने माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली असली तरी मी त्याकडे लक्ष देत नाही. कारण कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत,असे अजित पवार म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x