महत्वाच्या बातम्या
-
मनसेवर मतं फोडाफोडीचे आरोप करणारी शिवसेना देशभर भाजपची मत फोडण्यात व्यस्त?
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आणि ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना उमेदवारांचे या हिंदी भाषिक राज्यांमध्ये डिपॉझिट जरी जप्त झाले असले तरी, याच तीन राज्यांमधील भाजपचे ५ आमदार शिवसेनेने घेतलेल्या मतांमुळे पराभूत झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस
निवडणूक प्रतिज्ञापत्रात २ खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सतीश ऊके यांनी न्यायालयात फडणवीसांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. तसेच सदर प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आसाम NRC त्रुटी; अनेक परदेशी नागरिक भारतीय झाले, तर जे भारतीय आहेत त्यांना यादीत स्थानच नाही
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक अर्थात NRC नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवताना, कोणीही भारताला इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करु नये असे मत मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी याचिकेच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केले आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर धर्माच्या आधारे भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे होते, परंतु भारताने धर्म निरपेक्ष भूमिका स्वीकारली, असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थान-एमपी'त काँग्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या शक्यतेने मोदी सुद्धा घाईघाईत घोषणा करणार?
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे मोदी सरकार धास्तावले आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सुद्धा भिगावे लागतील याची चुणूक नरेंद्र मोदींना लागली आहे. त्यात ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये मोठे धक्के बसून थेट सत्ता गमावण्याची वेळ आल्याने मोदी सरकारने चांगलीच धास्ती घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तो पराभव मोदींचाच! सामनातून उद्धव ठाकरेंची टीका
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला आलेल्या अपयशावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनातून टीका बोचरी टीका केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्रपणाची स्तुती करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
जुमलेबाज मोदी हटाओ, योगी लाओ : लखनौमध्ये पोस्टर
५ राज्यांमध्ये दारुण पराभव झाल्याने सध्या नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाला विरोध होण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर लखनौमध्ये युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा अशी पोस्टरबाजी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या एका हिंदुत्ववादी संघटनेने युपीच्या राजधानीत हे पोस्टर लावल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
संसद अधिवेशन: राज्यातील दुष्काळापेक्षा, शिवसेना खासदारांना राम मंदिरावर चर्चा महत्वाची?
कालच ५ राज्यांमधील निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेने बोध घेतला आहे असं अजिबात वाटत नाही. कारण, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेनेचे खासदार राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर राम मंदिराच्या समर्थनार्थ घोषणा देत पोश्टरबाजी केली.
6 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात मायावतींचं काँग्रेसला समर्थन
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून मतदारांनी काँग्रेस आणि भाजप अशा कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत दिलेलं नाही. एकूण २३० जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला ११४ जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमताचा एकदा ११६ आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाला १०९ जागांवर विजय प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे सपा १, बसपा २ आणि अपक्ष उमेदवारांचा एकूण ४ जागांवर विजय झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व जनतेने स्वीकारले : शरद पवार
५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे जाहीर अभिनंदन केले. जनतेने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले असे सुद्धा ते म्हणाले, तसेच नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिंदी भाषिक राज्यांतील निकालाने भाजप-सेनेच्या मुंबई व आसपासच्या उत्तर-भारतीय राजकारणाला सुरुंग?
कालच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात तेलंगणात तिथला स्थानिक पक्ष टीआरएस’ने बाजी मारली, तर मिझोरामची सत्ता काँग्रेसने गमावली असली तरी तिथे सत्ता ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या स्थानिक पक्षाकडे गेली आहे. तेलंगणा आणि मिझोराम या दोन राज्यामध्ये भाजपच्या पुरता फज्जा उडाला असून भाजपचं या दोन राज्यांमधील अस्तित्व नगण्य झाले आहे. परंतु, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल हे निश्चित आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठवाडा: भाजप-शिवसेनेच्या राजवटीत ११ महिन्यात ८५५ शेतक-यांच्या आत्महत्या
सध्या दुष्काळाने हैराण झालेल्या मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर आले आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या राजवटीत मराठवाड्यातील बळीराजाचे आत्महत्याचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे निदर्शनास येते आहे. कारण, पावसाच्या अभावामुळे घेतलेल्या पिकांचे होणारे नुकसान तसेच अंगावरील वाढता कर्जाचा बोजा, तसेच मोठ्या दुष्काळामुळे सततची नापाकी आणि त्यात प्रपंचाची चिंता, अशा दयनीय अवस्थेत अडकलेल्या बळीराजासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेटकऱ्यांचे प्रश्न: 'मतदारांनी खरे धाडस दाखवले', पण तुम्ही सत्तेला लाथ मारण्याचं धाडस कधी दाखवणार?
४ राज्यांमधील मतदारांनी आगामी निवडणुकीत पर्याय कोण? याचा जराही विचार न करता जे नकोत त्यांना थेट नाकारले आहे. आणि त्यांना उखडून फेकले आहे. त्यामुळे असे धाडस दाखवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आजपासून भाजपसाठी 'पप्पू'चा परमपूज्य झाला' : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा निकाल आणि भाजपच्या पीछेहाट होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ५ राज्यांमधील निकालांवर मत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या जुलमी राजवटीला ही मतदाराने दिलेली चपराक आहे, अशा तिखट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
चाणक्यांनी छत्तीसगड'मधील पराभवाची जवाबदारी रमणसिंग यांच्यावर ढकलली
आजच्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपचा धुव्वा उडाला आहे. आजचा निकाल मान्य करताना माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांनी काँग्रेसला सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु विजय झाल्यावर आतुरतेने पत्रकार परिषदा घेणारे अमित शहा यांनी सर्व जवाबदारी रमणसिंग यांच्यावर ढकलण्याचे बोलले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या प्रचंड मेहनतीमुळे काँग्रेसला यश मिळाले : सोनिया गांधी
आज राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर एक वर्ष पूर्ण होतं आहे. दरम्यान, आजच्या ५ राज्यांमधील काँग्रेसच्या निकालावरून सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची स्तुती करताना म्हटलं की, पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राहुलने प्रचंड मेहनत घेतली आणि त्यामुळेच आजचं यश मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांची संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आजच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपाला सर्व राज्यांमध्ये अपयश आल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध होत असलेल्या निकालांनंतर भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेटकरी अभियान; म्हणतात ‘पप्पू पास पण मोदी नापास’; पाहा ट्रोल्स मालिका
५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या मतदाराने मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला स्पष्ट नाकारल्याचं चित्र आहे. परंतु. एरवी प्रसार माध्यमांवर संधी मिळताच विरोधकांवर शेलक्या भाषेत टीका करण्यासाठी तयार असणाऱ्या भाजप नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले आहेत. सर्व भाजप कार्यालयात शुशुकाट पसरलेला दिसतो आहे. त्यात ज्या राहुल गांधींना पप्पू म्हणून चिडवण्याची एकही संधी वाया न घालवणारे भाजप नेते सध्या राहुल गांधींच्या यशानंतर आणि मोदींच्या अपयशानंतर चांगलेच तोंडघशी पडले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: राजस्थानमध्ये आदित्य ठाकरेंकडे मतदारांचं दुर्लक्ष, प्रचार वाया गेला
शिवसेनेनं राष्ट्रीय पक्ष बनण्याचा ध्यास घेतला खरा, परंतु सर्वच ठिकाणी अपयशाची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरलेले आदित्य ठाकरे यांना पूर्णतः अपयश आले आहे. इथल्या मतदारांनी मतदान करताना शिवसेनेला साधं विचारात सुद्धा घेतले नसल्याचं दिसतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते म्हटले होते मोदी पंतप्रधान व्हावे 'ते' झाले, काल म्हणाले मोदींची उलटी गिनती सुरु होणार 'ती' झाली?
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल
सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB