महत्वाच्या बातम्या
-
महाड तळिये दुर्घटना | राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पहिला टेम्पो महाडच्या दिशेने
राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहाणी झाल. दरम्यान, एनडीआरएफ पथकाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. काल महाडजवळील तळिये गावात मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये 35 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गडप झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०१९ मधील सांगली-कोल्हापुर महापुरावेळी फडणवीस महाजानदेश यात्रेत मग्न होते | भाजप नेत्यांना विसर - सविस्तर वृत्त
जोरदार पावसाने कोकणात हाहाकार माजवला आहे. महापुराने चिपळूण पार उद्ध्वस्त झाले. लोक अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत; मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा वेळी पालकमंत्र्यांनी तिथे थांबून जनतेला मदत करायला हवी. पण पालकमंत्री एका रात्रीत मुंबईला पळ काढतात. हे पालकमंत्री नाही, हे तर पळपुटे मंत्री आहेत, या शब्दात भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना टोमणा मारला.
4 वर्षांपूर्वी -
तळीये दरड कोसळून जीवितहानी | मुख्यमंत्री आज तळीये गावात गावकऱ्यांशी संवाद साधणार
काल अतिवृष्टी झाल्याने महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळली. दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली ३५ पैकी ३२ घरं गाडली गेली. कालपासून (२३ जुलै) तळीयेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. दुपारी ते गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
प्रसार माध्यमांची गळचेपी | आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? - शिवसेना
दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आले दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. तसंच आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया देत, केंद्र सरकारवर घणाघात केला.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही पूरग्रस्त भागात अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो | तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा- चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात पावसाचं थैमान | लोकांच्या मदतीसाठी राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना पत्र
राज्यात पावसाने थैमान घातलंय. आज महाराष्ट्राला हादरविणाऱ्या तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून 32 लोकांचा लोकांचा मृत्यू झालाय. साताऱ्यातल्या आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 लोकांचा मृत्यू झालाय. तर तिकडे चिपळूणमध्येही 17 घरांवर दरड कोसळून जवळपास 20 लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. याच विषयाला अनुसरून आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांना पुढे यावं, तातडीने जशी जमेल तशी मदत तरावी, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
इस्रायलसाठी पेगासस दहशतवाद्यांविरूद्धचं शस्त्र | मोदी-शहांनी ते देशातील राज्य व संस्थांविरोधात वापरले - राहुल गांधी
भारतात पाळत ठेवण्यासाठी निवडण्यात आलेले फोन नंबर फक्त पत्रकार, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांपुरते मर्यादित नव्हते. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकही टार्गेटवर होते. इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबत नवे गौप्यस्फोट करणाऱ्या १० देशांच्या १७ माध्यम संस्थांनी ‘फॉरबिडन स्टोरीज’च्या हवाल्याने गुरुवारी खुलासा करत सांगितले की, भारताचे माजी सीबीआय प्रमुख आलोक वर्माही हेरगिरीचे टार्गेट होते. २०१८ मध्ये त्यांना पदावरून हटवल्याच्या काही तासांतच त्यांचा फोन नंबर पेगाससच्या यादीत टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर राफेल कराराशी संबंधित उद्योगपती अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीशी संबंधित लाेकांचे नंबरही पेगाससच्या यादीत टाकले होते.
4 वर्षांपूर्वी -
पेगासस प्रोजेक्ट | राफेल वाद उफ़ाळताच हेरगिरीच्या यादीत अनिल अंबानी व माजी CBI प्रमुखांचे नंबर गेले
भारतात पाळत ठेवण्यासाठी निवडण्यात आलेले फोन नंबर फक्त पत्रकार, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांपुरते मर्यादित नव्हते. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकही टार्गेटवर होते. इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबत नवे गौप्यस्फोट करणाऱ्या १० देशांच्या १७ माध्यम संस्थांनी ‘फॉरबिडन स्टोरीज’च्या हवाल्याने गुरुवारी खुलासा करत सांगितले की, भारताचे माजी सीबीआय प्रमुख आलोक वर्माही हेरगिरीचे टार्गेट होते. २०१८ मध्ये त्यांना पदावरून हटवल्याच्या काही तासांतच त्यांचा फोन नंबर पेगाससच्या यादीत टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर राफेल कराराशी संबंधित उद्योगपती अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीशी संबंधित लाेकांचे नंबरही पेगाससच्या यादीत टाकले होते.
4 वर्षांपूर्वी -
भारतात सत्य मांडणाऱ्या वृत्तपत्रावर इन्कम टॅक्स विभागाच्या धाडी | मोदींच्या फोटोसहित अमेरिकेतील वृत्तपत्रात हेडलाईन
दैनिक भास्करवरील आयकर विभागाच्या छाप्याच्या वृत्ताची दखल आता जागतिक दर्जाच्या माध्यमांकडे पोहोचल्या आहे आणि त्यामुळे मोदी सरकारची देखील जगभर निंदा होताना दिसत आहे. संसदेत सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज या प्रकरणामुळे आधीच स्थगित करण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टने हे वृत्त देताना मोदींचा फोटो वापरल्याने देशाच्या लोकशाहीची मान खाली झुकल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे शेतकरी नाहीत तर 'मवाली' आहेत | केंद्रीय मंत्र्यांचं आंदोलक शेतकऱ्यांविरोधात संतापजनक विधान
कृषी कायद्यावरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. केंद्र सरकारने आणलेले हे तीन्ही कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहे. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेक चर्चा झाल्या परंतु यावर काही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे सरकारही नरमाई घ्यायला तयार नाहीये. परंतु, 26 जानेवारी रोजी दिल्लीत उसळलेल्या हिंसेनंतर केंद्र सरकारने सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यास परवानगी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्निल लोणकर कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची भाजपकडून परतफेड | धनादेश सुपूर्द
एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांची सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सीबीआयने अनिल देशमुखप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळालेला नाही. एफआयआरमधील आक्षेपार्ह भाग वगळण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून अद्याप सुनावणी सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांना प्रवासाचा प्रचंड त्रास होतोय | मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
करोनाची दुसरी लाट ओसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. असं असलं तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मुद्द्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
IT'बाबत स्थायी संसदीय समितीने पेगासस प्रकरणी केंद्राकडे अहवाल मागवला | संसदीय समितीतही भाजपचे बहुमत
आयटीबाबत स्थायी संसदीय समितीने पेगासस प्रकरणावर केंद्राकडे अहवाल मागितला आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती आयटी व गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना पेगाससच्या माध्यमातून नेते, पत्रकार व इतरांवर पाळत ठेवल्याच्या बाबतीत प्रश्न विचारेल. समितीची बैठक २८ जुलैला होईल. यात दोन्ही मंत्रालयांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. समितीच्या बैठकीचा अजेंडा ‘नागरिकांची डेटा सुरक्षा व गोपनीयता’ हा आहे.
4 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजना | 1 हजार कामांतील भ्रष्टाचार रडारवर | ई-टेंडर शिवाय अनेक भाजप कार्यकर्त्यांना ठेकेदारी
फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झालेल्या १००० कामांची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी होणार आहे. विजयकुमार समितीने आपल्या अहवालात ही शिफारस केली असून उर्वरित १२८ कामांची विभागीय चौकशी करावी, असेही समितीने राज्य सरकारला सुचवले आहे. अनेक कामे ई-टेंडर न काढता करण्यात आली. काम न करता देयके अदा केली.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे | आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत - नाना पटोले
आघाडी सरकारमध्ये एकत्र असले तरीही काँग्रेस महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याविषयी घोषणा करत होते. आता त्यांच्या या घोषणांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पाठबळ दिले आहे अशी माहिती पटोले यांनी बुधवारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार असल्याचे पटोलेंनी सांगितले आहे. मंगळवारी कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेऊन पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा केली होती.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचं शुटिंग सुरू होतं | ठाकरे सरकारने हाणून पाडलं - नाना पटोले
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी पॉर्न फिल्म शूटिंग करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. मुंबई अशाप्रकारे पॉर्न फिल्म शूटिंग होत असल्याच्या बातमीनंतर संपूर्ण बॉलीवूडसह राज्यभरात खळबळ माजली आहे. मात्र पॉर्न फिल्मची शूटिंग ही राज्यात तात्कालीन देवेंद्र फडणीस सरकार आल्यापासून सुरू होतं, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस रडारवर? | कॅगने ठपका ठेवलेल्या जलयुक्त शिवार योजनेची ACB मार्फत चौकशीची शिफारस
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची ACB मार्फत सखोल चौकशी केली जावी, अशी शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांणा उधान आलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही बातमी काहीसी धक्कादायक असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
फोन रेकॉर्ड केले जातात | त्यामुळे मी शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू शकत नाही - ममता बॅनर्जी
पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका करताना, देशाला प्लास्टर करण्याची गरज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त केलेल्या संबोधनादरम्यान व्यक्त केली. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत ‘खेला’ होणार, असे आव्हानच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
1930 पासून मुस्लिमांची लोकसंख्या वाढली | कारण भारताला पाकिस्तान बनवायचे होते - मोहन भागवत
दोन दिवसांच्या आसाम दौर्यावर आलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी आता मुस्लिम आणि पाकिस्तानविषयी नवीन विधान केले आहे. संघ प्रमुख म्हणाले की, 1930 पासून भारतातील मुस्लिमांची संख्या नियोजित पद्धतीने वाढवण्यात आली. ते म्हणाले होते की बंगाल, आसाम आणि सिंध यांनाही पाकिस्तान बनवण्याची योजना होती. ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही, परंतु फाळणीनंतर पाकिस्तानची स्थापना झाली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB