महत्वाच्या बातम्या
-
मनसे, भाजप, शिवसेना झाली, बाळ्या मामा आता काँग्रेसमध्ये | अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये
महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सध्या पक्ष प्रवेश पाहायला मिळत आहेत. एकाबाजूला गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने एकामागून एक असे दोन धक्के दिले आहेत. ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश बाळा मामा म्हणजे सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना, मनसे, भाजप ,शिवसेना त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नारायण राणेंना कॅबिनेट समितीत देखील मोठी संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कॅबिनेट विस्तार केला. यामध्ये मोठे फेरबदल करताना १२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता आणि नव्यांना संधी देण्यात आली. आता प्रमोशन मिळालेल्या काही मंत्र्यांना अजून एक संधी मिळाली आहे. कारण आता कॅबिनेट समित्यांमध्ये देखील अनेकांना संधी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपामध्ये भूकंप? | १४ झेडपी सदस्य, ३५ पंचायत समिती सदस्य, ४० नगरसेवक, १६ बाजार समिती सदस्य, ११ मंडळ अध्यक्षांचे राजीनामे
बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून भाजपच्या पंचायत समिती सदस्यांपासून नगरसेवकांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र सुरू केले आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोमवारपर्यंत १५० राजीनामे आले असून ते मुंबईला गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
५ वर्ष सत्ता द्या म्हणत मोदींनी केवळ ७ वर्षात जनतेचे जगणे मुश्कील केलंय | इंधना दरवाढीतून २५ लाख कोटी कमावले - काँग्रेस
काँग्रेस पक्षाला ७० वर्षे सत्ता दिली मला फक्त ५ वर्ष सत्ता द्या म्हणून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी अवघ्या ७ वर्षात देशातील जनतेचे जगणे मुश्कील करुन ठेवले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या असून मोदी सरकारने इंधनाच्या करातून २५ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा पैसा देशातील जनतेच्या हितासाठी किंवा राज्य सरकारसाठी वापरला जात नाही, असा आरोप करून १९ तारखेपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारला इंधन दरवाढ व महागाईप्रश्नी जाब विचारु, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझ्यावरील आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून राजीनामा दिला - संजय राठोड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच भविष्यात मी दोषी आढळून आले तर कायमचा बाजूला होईल, असेही ते म्हणाले. भाजप सतत माझ्यावर आरोप करत आहे. मात्र, ते सतत माझ्यावर आरोप का करत आहेत याचे मी आत्मचिंतन करत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांच्याविरोधात पक्षांतर्गत राजकारण तापवलं जातंय? | बैठकीत धाडसी निर्णयाची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांना पंकजा मुंडे मंगळवारी भेटणार आहेत. मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पंकजा मुंडे समर्थकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारीच त्या दिल्लीहून मुंबईला परतणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दिल्ली वारीनंतर समर्थकांची समजूत काढताना पंकजा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी सुद्धा पंकजांना राष्ट्रीय मुद्यांच्या बहाण्याने सुनावले | वेगळा निर्णय घेण्याची शक्यता बळावली
बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बीड मध्ये भाजपच्या विरोधात मोठा आक्रोश उमटत असताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गोपिनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचा विसर मोदी सरकारला पडल्याचे पहायला मिळाल्याने अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा अध्यक्षांकडे सोपविले असून, जिल्हाध्यक्ष देखील पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला. याचमुळे आता मुंडे समर्थक आक्रमक झाले असून, उद्या शेकडो कार्यकर्ते पंकजा भेटून वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी वनमंत्री संजय राठोड आणि बंजारा समाजातील लोकांच्या भेटीगाठी | चर्चा सुरु
माजी वनमंत्री संजय राठोड सध्या बंजारा समाजातील लोकांनी भेट घेण्याचा प्लान संजय राठोड य़ांनी आखला आहे. लवकरच यासंदर्भात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांना देखील पक्षावर विश्वास असून त्यांनी यापुढे काय होणार, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली, असं स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावरच, मनसेबरोबर युती नाही - आ. आशिष शेलार
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय जनता पक्षानेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार अॅड. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने बरोबर युती करणार नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत - विनायक मेटे
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या विषयी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या कि ‘ आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, निवडून आलेल्यांना आम्ही शुभेच्छा देतो’, मात्र अद्यापही प्रीतम मुंडे कुठेही समोर आलेल्या नाहीत. या नंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त असून ७७ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडूनच सरकार अस्थिर करण्यासाठी मनगढत कहाण्या पेरल्या जात आहेत - नाना पटोले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आज उत्तर दिलं आहे. ‘पटोले यांनी योग्य माहिती अभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करून घ्यावी,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सहकारी पक्ष भडकले | पटोले स्पष्टीकरण देताना म्हणाले, ते वक्तव्य केंद्राबाबत होतं, राज्याबाबत नव्हे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आज उत्तर दिलं आहे. ‘पटोले यांनी योग्य माहिती अभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करून घ्यावी,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सध्या 12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलं बरं आहे - उर्मिला मातोंडकर
पावसाळी अधिवेशन संपले तरीही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीचा प्रश्न काही सुटला नाही. शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना आमदारकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे नाव राज्यपालांकडे पाठवले आहे. ’12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरं आहे, पण आमदारकी मिळाली तर आनंदच आहे’, असं म्हणत ऊर्मिला यांनी आपली इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारला लक्ष करताना 'कसाई' ऐवजी 'खाटीक' असा शब्द वापरला | टीका होताच भातखळकरांचा माफीनामा
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या शहरातून गाय चोरीच्या घटना समोर आली होती. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच या गाय चोरीच्या घटना घडताना समोर आल्याने राजकारणही करण्यात आलं. त्यामुळे विरोधकांनी भिवंडीतील कत्तलखाने पुन्हा सक्रिय झाल्येत का? असा सवाल उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संकटात ६ महिने बिळात लपून बसणाऱ्यावर काय बोलायचं? | लंकेंचा विजय औटींना टोला
शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. विजय औटींच्या टीकेला निलेश लंके यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिल्याने विजय औटींचा पुन्हा त्रागा होण्याची शक्यता आहे. मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे.समाजकारणात, राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले.
4 वर्षांपूर्वी -
मुंडे समर्थक 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही पत्रं
पंकजा समर्थक आणि बीडचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे तब्बल ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे प्रमुख राज ठाकरे ३ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार | संघटनात्मक विषयांवर जोर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल पुण्यात आले होते. यानंतर आता पुण्यापाठोपाठ राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे हे १६ ते १८ जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जुना बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
अधिकाऱ्यांच्या नियुक्तीतून भाजप कर्नाटक सरकारकडून वसुली | मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांमार्फत करोडोची वसुली
महराष्ट्रातील सरकारवर भारतीय जनता पक्षाने वसुली सरकार असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. मात्र आता भाजप मध्ये वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किती मोठी वसुली केली जाते ते समोर आल्याने खळबळ माजली आहे. विशेष महाराष्ट्रात मुंबई पोलीस आयुक्तांनी आरोप केल्यांनतर सीबीआय आणि ईडी वेगाने कामाला लागली होती. त्यासाठी कारण दिलं गेलं की वरिष्ठ अधिकाऱ्याने आरोप केल्याने प्रकरण गंभीर आहे. मात्र आता कर्नाटकमधील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री येदियुरप्पा नियुक्त्यांच्या बदल्यात त्यांच्या नातेवाइकांमार्फत करोडो रुपयांची वसुली करत होते अशी धक्का दायक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला | राज्यातील पक्षांतर्गत विरोधकांची चिंता वाढली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील माध्यमांनी केंद्रीय सहकार खात्यामुळे इथल्या सहकार चळवळीवर परिणाम होईल असे भासवले - शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यावेळी नव्याने सहकार खातेही तयार करण्यात आले आहे. अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वेगळे खाते निर्माण केल्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रकरणे बाहेर काढले जातील अशा चर्चा होत्या. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN