महत्वाच्या बातम्या
-
गुजरातसाहित अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहीम लांबणीवर | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. असे असताना व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे तीन दिवस कोरोना लसीकरण केले जाऊ शकणार नाही. येथे 2 मेपर्यंत लसीकरण मोहिम थांबवण्यात आली आहे. BMC ने गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली की, ‘लसीच्या कमतरतेमुळे पुढच्या तीन दिवसांपर्यंत मुंबईमध्ये व्हॅक्सीनेशन करणार नाही.’ तत्पूर्वी, मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर यांनी गोरगाव येथील नेस्को लसीकरण केंद्रावर अचानक भेट दिली. केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.
4 वर्षांपूर्वी -
युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? - रोहित पवार
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. चढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुळ भातखळकर यांना चांगलंच धारेवर धरलंय. “युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन असलेल्या राज्य व शहरांमध्ये IPL सुरु, कारण IPL अमित शहांचा मुलगा ऑपरेट करतो - काँग्रेस
देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.
4 वर्षांपूर्वी -
ही कसली घमेंड आहे, की तुम्ही लोकांसमोर स्वतःच अपयश स्वीकारण्यास तयार नाही - नरेंद्र मोदी
देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.
4 वर्षांपूर्वी -
सुजय विखे पाटील यांनी रेमडेसिव्हीर कशी आणली माहिती सादर करा, कोर्टाचे आदेश | CCTV फुटेजहि मागवले
रेमडेसिव्हीरचे 300 इंजेक्शन थेट दिल्लीहून मागवल्यामुळे भाजप खासदार सुजय विखे यांच्या अडचण्याची शक्यता आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी शिर्डी विमानतळ येथे उतरवण्यात आलेल्या खासगी विमानाची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. ही माहिती गृह विभागाचे मुख्य सचिव सादर करतील. दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील आदेश दिले. या प्रकरणावर पुढील सुनावणी 3 मे रोजी होईल.
4 वर्षांपूर्वी -
Exit Poll 2021 | पश्चिम बंगालमध्ये ममता राज, तर तामिळनाडूत एनडीए'ला धक्का देत DMK सुसाट जाणार
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी आठव्या टप्प्यातील मतदानासोबतच ५ राज्यांच्या निवडणुकांची सांगता झाली. निकालांसाठी २ मेची वाट पाहावी लागेल. कारण, गुरुवारी मतदानानंतर समाेर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्येही निकालांवर एकमत नाही. ४ माेठ्या संस्थांच्या पोलपैकी २ पोल ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला, तर एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमताचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने तर दोन्ही पक्षांना जवळपास सारख्या जागा देत दोघांनाही बहुमत दर्शवले आहे. म्हणजे बंगालच्या मतदारांनी यंदा एक्झिट पोल संस्थांकडेही आपली ‘मन की बात’ सांगितलेली नसल्याचे दिसते. खरा निकाल २ मे रोजीच लागणार आहे. भाजप व तृणमूलने एक्झिट पोल्स आपल्याच बाजूने असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खोटं बोलले म्हणून फेसबुकने त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं | तर भारतीय सत्य बोलले म्हणून #ResignModi....
देशात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि लाखो लोकं आजपर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडली आहेत. त्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात येत आहेत. ट्विटर आणि फेसबुक युजर्स #ResignModi हा हॅशटॅग चालविण्यात येत होता. मात्र, 28 एप्रिल रोजी फेसबुकने हा हॅशटॅग काही काळासाठी ब्लॉक केला.
4 वर्षांपूर्वी -
राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत | पुण्यातच उपचार - कुटुंबीयांची माहिती
कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र केवळ पर्यवेक्षण व रुटीन तपासणीसाठी मुंबई येथील पथक येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे. खासदार राजीव सातव मागील आठवड्यातच हिंगोली येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा व रुग्णांची परिस्थिती याची सविस्तर चौकशी केली होती. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहितीही त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन घेतली होती. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे हिंगोली जिल्ह्यातील सुविधांबाबत कळविले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात वेळोवेळी राजीनामे मागता, आता देशात स्मशाने धगधगत असताना कुणाचा राजीनामा मागावा? - शिवसेना
कोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत. त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देशातील कोरोना स्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या सत्ताकाळात कोरोनामुळे तुमचा जीव वाचेल त्यालाच 'विकास' समजा - काँग्रेस
कोरोनाने गेल्या एक वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त लोक आपल्यातून हिरावून घेतले. मंगळवारी देशात सर्वाधिक ३,२८५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी आकडेवारीत २,०१,१६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. तथापि, खरे आकडे यापेक्षाही खूप जास्त आहेत. त्याचबरोबर देशात प्रथमच एका दिवसात २.६२ लाख लोकांनी कोरोनावर मात केली ही दिलासादायक बातमीही आली. आतापर्यंत १.४८ कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रश्मी शुक्ला अडचणीत येताच भातखळकरांचे CBI मधील सूत्र कार्यरत | प्रथम भातखळकरांना दिली गोपनीय माहिती?
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
2016 मध्ये बँकेबाहेर लाईन, 2020 मध्ये दवाखान्या बाहेर लाईन, 2021 ला स्मशानभूमी बाहेर लाईन...अजब खेळ आहे - काँग्रेस
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. परंतु त्यासाठी पुरेशी लस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी केंद्रे बंद करावी लागत आहेत. पुढील महिन्यात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पण मर्यादित लोकसंख्येला लस मिळत नसताना लसीकरणाची महामोहीम बारगळणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन
मुंबई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागात बायका डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेत नाहीत | तसंच मीडियावाले डायरेक्ट मोदींच नाव न घेता 'सिस्टिम' म्हणतात
भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोनासाठीच्या खास वैद्यकीय सेवा तर दूरच पण लोकांना रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन आणि औषधे देखील मिळत नाहीये. कोरोनामुळे जीव गेला तर स्मशानभूमी आणि कब्रस्तानात जागा सापडत नाहीये. अतिशय चिंताजनक परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. यावर परदेशी माध्यमांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. जाणून घ्या परदेशी मीडिया हाऊस काय म्हणत आहेत..
4 वर्षांपूर्वी -
कौतुकास्पद | राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके थेट कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची देखभाल करत आहेत
राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. दरम्यान राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार का? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता - जयंत पाटील
आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे येतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही गेल्या वर्षी लोकांना थाळ्या-टाळ्या वाजवायला सांगितल्या, त्याने काय झाले? | दुसऱ्या लाटेला मोदी सरकारच जवाबदार
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत थोडी फार घट होताना दिसत आहे.भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींवर पूर्ण विश्वास, ते मद्रास कोर्टाच्या टिप्पणीला गांभीर्याने घेतील असा मला विश्वास - संजय राऊत
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केला. राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही.
4 वर्षांपूर्वी -
ते 'लोटस' नव्हतं... खरं तर ते 'लूट-अस' होतं - तेजप्रताप यादव
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा, त्या यादीत महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश - सचिन सावंत
केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE