20 April 2025 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

मोदींनी केवळ मोठ आश्वासने दिली आणि जनमत वाया घालवले

नवी दिल्ली : मोदींचा साडेचार वर्षातील कार्यकाळ पाहिल्यास त्यांनी दिलेल्या ढीगभर आश्वासनांवरून सामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आपण सर्वानी मोदींचा एकूणच पंतप्रधानपदाचा कार्यकाळ नीट पाहिल्यास हा काळ अनेक विरोधाभासात्मक कृतींनी व्यापलेला आहे असं जाणवेल. मागील लोकसभा निवडणुकीत जनतेकडून मिळालेले जनमत त्यांनी मोदींनी पूर्णपणे वाया घालवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे.

‘पॅराडॉक्सिअल प्राइम मिनिस्टर’ या शशी थरूर लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. मनमोहनसिग यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, मोदींनी संपूर्ण देशाचा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. परंतु, जातीय हिंसा, मॉब लिचिंग आणि गोरक्षकांचा उच्छाद अशा घटनांवर त्यांचे सरकार नेहमीच शांत राहिले आहे.

देशातील भेदरलेली जनता, अविचारी निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान, रोजगारांची कमतरता, शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेला अविश्वास, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सीमारेषेवरील असुरक्षित वातावरण, काश्मीरमधील अस्थिरता आणि मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेल्या सरकारी योजनांचे अपयश ही मोदींच्या कारकीर्दीची व्यवच्छेदक लक्षणे राहिली आहेत. मोदींच्याच कार्य काळात देशात निधर्मीवाद, विविधता, स्वातंत्र्य, तसेच गेल्या अनेक दशकांपासून भारतीय समाजात अबाधित असलेली समानता या कशालाही थारा नसल्याची बोचरी टीकाही यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या