23 February 2025 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बोलावतात आणि अपमान करतात - नितीन गडकरी

राजकीय सत्ता म्हणजे विकासाचे साधन. परंतु २०१४, मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन सर्वसामान्य जनता फक्त घोषणांचाच पाऊस झेलत असल्याचे चित्र सध्या तरी देशात आणि राज्यात दिसून येत आहे. यू.पी.ए. सरकारने केलेल्या योजना फक्त नामांतर करून पुन्हा लोकांसमोर मांडणे आणि काहीतरी मोठे केल्याचा गाजावाजा म्हणजेच उत्तम मार्केटिंग करणे हे या सरकारला उत्तम जमते असे काही जाणकारांचे मत आहे. असे काहीसे निर्णय हे सरकार बहुमताने न घेता सत्तेत काही महत्वाचे लोक, यशवंत सिंन्हांच्या मते अडीच लोक हे सगळे निर्णय घेतात आणि इतर सर्व जेष्ठ नेतेमंडीळीना डावललं जातं.

माजी खासदार आणि किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत असतानाचा एक असाच काहीसा अनुभव सांगितला. मोदी सरकारकडून देशभरात जीएसटी लागू करण्यात आला आणि त्यानंतर या निर्णयावर मत मांडण्यासाठी मोदींनी सर्वाना सांगितले. नाना पटोलेंनी मोदींच्या या निर्णयाला विरोध केला, हा विरोधाचा सूर ऐकताच मोदी पटोलेंवर संतापले आणि त्यांना प्रश्न केला ‘तुम्ही मला शिकवणार का?’. त्यानंतर हि बैठकच गुंडाळण्यात आली आणि तिकडे उपस्थित असलेल्या कोणत्याही नेत्याने माझ्याकडे येण्याची हिम्मत नाही दाखवली. परंतु मोदी सरकारमध्ये असलेला विकासाचा एकमेव चेहरा म्हणजे नितिन गडकरी हे त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना फक्त इतकंच म्हणाले ‘इथे घरी बोलावले जाते आणि अपमान केला जातो’.

मोदी-शहांची हि पद्धत भाजप नेत्यांना काही नवीन नाही आणि त्यांना याची सवय देखील झाली असावी. यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणाऱ्या नेत्यांनी लोककल्याणाचा विचार आधी करावा हे अपेक्षित, परंतु तसे घडताना काही दिसत नाही. पक्षात अनेकजण दुःखी आणि नाराज आहेत त्यामुळे भाजपामध्ये फूट पडली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही असेही पटोले यांनी म्हटले आहे.

मी राजा आणि माझ्यासमोर कोणीही मोठे नाही असे मोदींचे धोरण आहे, अशी एकंदर टीका नाना पटोलेंनी औरंगाबाद मध्ये एका कार्यक्रमात बोलताना केली. मी सांगतो तेवढच ऐकायचं आणि तेवढच काम करायचं असेही पटोलेंनी निदर्शनास आणले. याचवेळी नाना पटोले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर पटोले म्हणाले, सत्तेत येण्याआधी फडणवीस सरकारने १ प्रश्न केला होता ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ आणि आता सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र गायबच करून टाकलाय अशी टीका करायला ते विसरले नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणजे सर्वात वाईट मुख्यमंत्री आहेत अशीही टीका पटोले यांनी केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x