21 April 2025 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

भाजप आगामी लोकसभा निवडणूक राम मंदिराच्या जोरावर जिंकण्याच्या विचारत आहे

नवी दिल्ली : द्वारकाचे शंकराचार्य जगदगुरु स्वरूपानंद सरस्वती हे वृंदावन येथे एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी त्यांनी मोदीसरकारवर सडकून टीका केली. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मोदींना दिलेल्या झप्पीचे खुलं समर्थन सुद्धा केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाचे कौतुक सुद्धा केले आहे. त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

संसदेत राहुल गांधीनी मोदींना दिलेल्या झप्पीचे ते कौतुक करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यक्ती म्हणून विरोध नाही तर मोदी सरकारच्या धोरणाला विरोध असल्याचे काँग्रेस अध्यक्षांनी गळाभेटीतून दाखवून दिले आहे. तसेच राहुल गांधींना पप्पू म्हणणाऱ्याला विरोध न करता भाजपाच्या धोरणाला विरोध केला असल्याचा टोलाही शंकराचार्यांनी भाजपाला लगावला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या विषयावर बोलताना शंकराचार्य म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला अयोध्येत राम मंदिर बांधायचे नाही, त्यांना आगामी लोकसभा निवडणूक राम मंदिराच्या जोरावर जिंकायची आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप सुद्धा शंकराचार्यांनी केला. पुढे ते म्हणजे की, सरकार येऊन सुद्धा नरेंद्र मोदी सरकार गोहत्या बंदीचा कायदा बनवू शकले नाही आणि कलम ३७० व समान नागरि कायदाही अंमलात आणू शकलेलं नाही अशी थेट टीका त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर केली आहे.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपाच्या राम मंदिराच्या धोरणावरही टीका केली. ते म्हणाले की, भाजपाला राम मंदिर बांधायचे नाही, आगामी लोकसभा निवडणूकीत राम मंदिराच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचा विचार आहे. राम मंदिरावर भाजपा लोकांची दिशाभूल करत आहे. मोदी सरकार गोहत्या बंदीचा कायदा बनवू शकले नाही. याशिवाय कलम 370 आणि समान नागरि कायदाही आमंलात आणला नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या