22 February 2025 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

शरद पवारांची सरसंघचालक मोहन भागवतांवर कडाडून टीका.

पंढरपूर : मोहन भागवत जे बोलत आहेत त्या त्यांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांनाही कळू द्या असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंढरपूर येथे आयोजित केलेल्या एका शेतकरी मेळाव्याला संबोधताना म्हणाले. या शेतकरी मेळाव्यात पवारांनी नीरव मोदी, संभाजी भिडे. मिलिंद एकबोटे, सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्र सरकार या सर्वांवरच आपल्या भाषणातून जोरदार हल्ला केला.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मागील विधानाचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले की, माझी केंद्र सरकार आणि भारताच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की मोहन भागवत म्हणतात त्याप्रमाणे भागवतांच सैन्य देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी काठ्या घेऊन देशाच्या सीमेवर पाठवून द्यावं म्हणजे त्यांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांसमोर येईल.

त्यानंतर पीएनबी बँक ११,३०० कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदींवर बोलताना पवार म्हणाले की, सध्याचं सरकार या घोटाळ्याच खापर तत्कालीन यूपीए च्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्नं करत आहे. तसेच पुढे ते असेही म्हणाले की देशातील एका जवाबदार व्यक्तीने नीरव मोदी हे अशा पध्दतीने घोटाळा करीत असल्याचे लेखी स्वरूपात पंतप्रधान कार्यालयाला कळवले होते परंतु पंतप्रधान कार्यालयाने ते गंभीरपणे घेतलं नाही आणि जाणीवपूर्वक देशाची लूट करू दिली की काय अशी शंका निर्माण होते.

सत्ताधारी पक्षातले लोक हे भिडे आणि एकबोटे यांचे पाय धरण्यात धन्यता मानणारे असल्याने त्यांच्यावर कितपत कारवाई होईल याबाबत शंका आहे असे शरद पवार पुढे म्हणाले. तसेच सत्ताधाऱ्यांना राज्यस्थान, कर्नाटक आणि त्रिपुरा राज्यांत अपेक्षेप्रमाणे निकाल लागला तर लगेचच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील, अन्यथा सध्याचं सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे ही पवार पुढे म्हणाले.

आमच्या पक्षाचे प्रयत्न आहेत की सर्वच घटक पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणूक लढवावी आणि त्यासाठी आमचे दिल्लीमध्ये चर्चा सत्र सुध्दा असल्याचे शरद पवार उपस्थितांना संबोधताना म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x