23 February 2025 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

उद्योग मंत्रिपद शिवसेनेकडे; तरी राज्याच्या औद्योगिक घसरणीवरून सरकारवर टीका

मुंबई : औद्योगिक गुंतवणुकीच्या बाबतीत देशात सतत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची आता अधोगती सुरु असताना शिवसेनेने सामना या मुखपत्रातून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. वास्तविक राज्याचं कॅबिनेट उद्योगमंत्री पद हे शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडे असताना शिवसेनेने ही टीका केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नाणार’मधील टीकेनंतर आणि फसलेल्या उद्योगनीतीनंतर ५ वर्ष मंत्रिपद स्वतःकडे ठेऊन सर्व दोष भाजपाच्या माथी मारण्याचे प्रकार सुरु असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

सामना मधील अग्रलेखात म्हटलं आहे की,”गुजरात विकासाचे ‘मॉडेल’ संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून तिकडे सुद्धा गुंतवणूकदारांची संख्या घटली असल्याचे टले आहे. तसेच शेजारच्या कर्नाटकात मागील १० वर्षांपासून बिगर भाजप शासन सत्तेवर आहे तर महाराष्ट्र आणि गुजरातेत भाजपचे ‘मेक इन इंडिया’ राज्य आहे. पण तरी सुद्धा या दोन्ही राज्यांची औद्योगिक आणि आर्थिक घडी विस्कटलेली दिसते अशी टीका करण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या विकासाचे अजगरी वेटोळे महागड्या मेट्रोभोवतीच पडले असून केवळ काही ठराविक उद्योगपतींच्या सोयीसाठी ‘अवनी’ नावाच्या वाघिणीस मारले जाते, असा सणसणीत टोला सुद्धा लगावला आहे.

दरम्यान, कर्नाटकने औद्योगिक गुंतवणुकीच्या बाबतीत झेप घेतली याचे दुःख नाही, पण महाराष्ट्र राज्य या बाबतीत का घसरला याचीच टोचणी असल्याची खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे. तुम्ही विकासाच्या गॅसचे फुगे किती सुद्धा उडवले तरी योग्य वेळ येताच ते फुटतात. एकीकडे गुजरातेत ४,५०० कोटी इतका सरकारी निधी वापरून सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभा केला. तसा महाराष्ट्रात ३,५०० कोटी रुपये सरकारी खर्चाने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहणार आहे, केवळ त्याला मुहूर्त सापडत नाही अशी टीका केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x