20 April 2025 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

तो पराभव मोदींचाच! सामनातून उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला आलेल्या अपयशावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनातून टीका बोचरी टीका केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्रपणाची स्तुती करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान, ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच पराभव असल्याची बोचरी टीका सामनातून करण्यात आली आहे. जर नरेंद्र मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा आणि अंतर्गत तिकीट घोटाळ्याचा ठरला असता. परंतु, पंतप्रधान पक्षातील सर्व फौजफाटा घेऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते.

तसेच त्याच्यासोबत भाजपचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे हा पराभव केवळ पंतप्रधानांचाच आहे, अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे. सदर टीका आजच्या, ‘गांधी का टिकले?; महाभारत’ या आजच्या सामनातील संपादकीयमधून करण्यात आली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्र स्वभावाचे कौतुक करताना, ‘मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायला सुद्धा तयार नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने संपूर्ण जवाबदारी संबंधित राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांवर ढकलून मोदींची कातडी वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न केल्याचे दिसते आहे. त्याला अनुसरूनच सामनातून ही टीका करण्यात आली असावी असं प्रथम दर्शनी वाटते आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या