लोकांमध्ये इतका असंतोष असताना भाजप निवडणुका जिंकतंच कसं? उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात असलेली एकूणच राजकीय परिस्थिती संप आणि आंदोलन तसेच जनतेतील असंतोष पाहता महाराष्ट्रातील महानगरपालिका,पंचायत, नगरपालिका अशा सगळ्या निवडणुका भाजप जिंकतंच कसं आणि मुख्यमंत्री लोकप्रिय असल्याचा दावा आपण करतातच कसा असा खडा सवाल शिवसेनेने सामना या मुखपत्रातून केला आहे.
आजच्या ‘राजा लोकप्रिय,प्रजा संपावर’ या सामनातील अग्रलेखात फडणवीस सरकार आणि भाजपवर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. तसेच त्यांच्या विजयरथावर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. सामनातील अग्रलेखात म्हटलं आहे की, सामनातील ‘राजा लोकप्रिय,प्रजा संपावर’ या अग्रलेखात फडणवीस सरकारवर शिवसेनेने कडवी टीका केली आहे. सध्या राज्यात एकामागोमाग एक संप होत आहेत. कर्जमाफी, हमीभावासाठी शेतकरी संपावर जातात, तर ७ वा वेतन आयोग लवकरात लवकर लागू व्हावा म्हणून १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर जातात. तर दारिद्याने पिचलेला आणि बेरोजगारीने ग्रासलेला मराठा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. इतका प्रचंड असंतोष लोकांच्या मनात असतानाही आणि समाजातले वेगवेगळे घटक आंदोलन आणि संप करत असतानाही भाजप एकामागोमाग एक निवडणुका जिंकतंय याचं आश्चर्य शिवसेनेने व्यक्त केलं आहे.
त्यातच मुख्यमंत्री फडणवीस एकीकडे लोकप्रिय असण्याचा दावा करतात तर दुसरीकडे त्यांना सत्तेवर आणणारे उद्रेक करतात मग हेच सरकारच्या लोकप्रियतेचे लक्षण का? सरकार खरंच लोकप्रिय आहे का असा सवालही शिवसेनेने या अग्रलेखातून विचारला आहे. पुढे शिवसेनेने भाजपच्या जाहिरातबाजीवर टीका करताना म्हटलं आहे की, ‘भाजपकडे जाहिरातबाजीसाठी वापरायला अवैध पांढरा पैसा सरकारकडे आहे, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची वेळ येते तेव्हा सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगण्यात येते असं म्हणत राज्य सरकारच्या नैतिकतेवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच निवडणुकीआधी तोंडफाटेपर्यंत आश्वासनं द्यायची आणि निवडणुकीनंतर त्यापासून पळ काढायचा असं म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.
वाचा आजचा अग्रलेख : राजा लोकप्रिय; प्रजा संपावर
निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा. हे शेतकऱ्यांच्या बाबतीत झाले, तसे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतदेखील झाले. https://t.co/Ux8k2xABzF
— Saamana (@Saamanaonline) August 10, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल