16 April 2025 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

नागपूरमध्ये पावसाने केली सरकारची नाचक्की

सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळाचा आजचा तिसरा दिवस असून वीजपुरवठा खंडित असल्या कारणाने आजचा विधिमंडळाचा दिवस वाया गेल्याची चिन्ह आहेत. काल रात्रीपासूनच्या सततच्या पावसाने शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी साठले आहे आणि याच कारणाने शहरात बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

विधिमंडळाच्या तळघरात पाणी शिरल्याने विधिमंडळाचा देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अर्थातच अंधारात काम करणे शक्य नसल्याने विधिमंडळाचे कामकाज आज बंद करण्यात आले. वीजपुरवठा नसल्याने कामकाज बंद पडण्याची हि पहिलीच वेळ असल्याने सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे असा सूर विरोधकांनी लावला.

विधिमंडळात येताना आज सर्वच आमदारांची चांगलीच तारांबळ उडाली आणि सर्व आमदारांना अंधारातच बसावं लागलं. नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या शिवसेना आमदारांना देखील मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात घोषणा बाजी करावी लागली. केवळ सरकारने हट्टापायी सगळी यंत्रणा नागपूर अधिवेशनात लावली उलट हे अधिवेशन नागपुरात केलं तर थोड्याच पावसाने विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होईल असं एका अहवालात सांगण्यात आलं होत, अशी माहिती विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. जर हे अधिवेशन मुंबईमध्ये केलं असतं तर मुंबईतील सुसज्ज यंत्रणेमुळे सरकारवर हि नामुष्की ओढवली नसती असे मत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी व्यक्त केले.

अर्थातच काय जिकडे सरकार एवढी सुसज्ज यंत्रणा घेऊन तोंडघशी पडली तिथे सर्वसामान्य माणसाचे होणारे रोजचे हाल आणि पावसामुळे प्रवासात होणारा त्रास हे सरकार कधी समजेल एवढीच आशा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या