23 February 2025 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

शेतकऱ्यांची चेष्टा; फडणवीस सरकारकडून बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले व पीकाचा सर्वे

बीड : सध्या ग्रामीण महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. त्यात सरकारने सध्या केवळ ‘दुष्काळ सदृश्य’ परिस्थिती असा उल्लेख केल्याने विरोधकांनी रोष व्यक्त केला असताना फडणवीस सरकारचा शेताचे दाखले आणि पीकाचा दिखाऊ सर्वे समोर येत आहे. कारण, सध्या महाराष्ट्र सरकारकडून दुष्काळी ग्रामीण भागाची पाहणी सुरु आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे राज्य मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बीडमध्ये रात्रीच्या वेळेला चक्क बॅटरीच्या प्रकाशात पीक पाहणी केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. पुढे असेच दिखाऊ प्रकार आणि सर्वे अनेक भागात होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काल म्हणजे शनिवारी रात्री उशिरा दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नित्रुड या गावात राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर गेले होते. दरम्यान, त्यावेळी गावाशेजारी विजेची सुविधा नसल्याने त्यांनी चक्क लहान बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले आणि पीकाचा सर्वे केला. दुसरं धक्कादायक म्हणजे हा संपूर्ण गावाचा सर्वे त्यांनी केवळ २० मिनिटांत पूर्ण केला, त्यामुळे फडणवीस सरकार सर्वेच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची केवळ चेष्टा करत आहे का, अशी शंका शेतकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या प्रकाशात सर्वे केल्याने सरकार या विषयावर किती गंभीर आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे. दिवसा ढवळ्या सर्वे करून शेतकऱ्यांना नीट भरपाई मिळत नसताना आता रात्रीच्या अंधारात सरकारला काय नुकसान दिसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सरकारच्या या दिखाऊ सर्व्हमुळे दुष्काळात होरपळणारा शेतकरी अजूनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विषयावर विरोधक काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x