22 February 2025 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

मराठयांच्या शौर्यामुळेच भारताचं आजच स्वरूप : देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय हा महत्वाचा असून त्यावर सरकार कडून कार्यवाही सुध्दा सुरु आहे. सरकार त्यावर न्यायालयात सक्षमपणे आपले काम करत आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा सन्मान सोहळ्यात उपस्थितांना संबोधताना केले.

आरक्षणाबाबत मागील काही वर्षांपासून मराठा तरुण आणि तरुणींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती आणि त्यामुळेच मराठ्यांचे अभूतपूर्व मोर्चे निघाले. मराठांची ते मोर्चे इतके विशाल होते की त्याची तुलना थेट महाभारतातील एक घटनेशी करताना मुख्यमंत्री म्हणाले की महाभारतात श्रीकृष्णाने जसे त्यांच्या विराट रूपाचे दर्शन दिल्यावर जशी संपूर्ण सृष्टी नतमस्तक झाली होती तसेच मराठा मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विराट रूपाचे दर्शन सर्वांना झाले. आमचे संपूर्ण सरकार मराठा मोर्च्यापुढे नतमस्तक झाले होते आणि त्यामुळेच आम्ही विविध निर्णय मराठा समाजाच्या हितासाठी घेतले होते असे मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

आमचं सरकार न्यायालयात सक्षमपणे आपली जवाबदारी पार पाडत असून मराठा आरक्षण हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे असेही फडणवीस म्हणाले. शिष्यवृत्ती दिल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडली गेली ज्याचा लाखो तरुणांना प्रत्यक्ष फायदा होत आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ हे केवळ कागदावरच होते जे आमच्या सरकारने जिवंत केले असून त्याचा थेट फायदा मराठा तरुण घेत आहेत असे ही फडणवीस उपस्थितांना संबोधताना मम्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x