16 April 2025 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

MP Varun Gandhi Leaving BJP? | खा. वरुण गांधी भाजप सोडणार? | ट्विटरवरून भाजपचं नाव हटवलं

MP Varun Gandhi Leaving BJP

लखनऊ, ०४ ऑक्टोबर | योगी सरकारला खरमरीत पत्रं लिहिल्यानंतर वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला आहे. त्यामुळे वेगवेगळे कयास वर्तवले (MP Varun Gandhi Leaving BJP) जात आहेत. वरुण गांधी भाजप सोडणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये वरुण यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. शिवाय भाजप पक्षातही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते अडगळीत पडल्याची भावना त्यांना सतावत असावी. म्हणूनच ते भाजपवर नाराज असल्यानेच त्यांनी अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे.

MP Varun Gandhi Leaving BJP. BJP MP Varun Gandhi has removed the BJP’s name from his Twitter account. He is now being surprised by the deletion of BJP’s name directly from his Twitter account :

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचं नाव काढून टाकलं आहे. वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर थेट हल्ला करत आहेत. त्यानंत त्यांनी आता थेट ट्विटर अकाउंटवरून भाजपचं नाव हटवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून वरुण गांधी भाजप सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वरुण गांधी यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रंही लिहिलं आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. लखीमपुरा हिंसेबाबत वरुण गांधी यांनी योगी सरकारला पत्रं पाठवलं होतं. आंदोलक शेतकऱ्यांवर निर्दयपणे हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MP Varun Gandhi Leaving BJP after Lakhimpur kheri violence.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या