17 April 2025 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

आम्ही निवडणुकीला एकत्र येणार का, हे आता सांगता येणार नाही: उद्धव ठाकरे

पुणे : भाजप आणि शिवसेनेमधील भांडण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सारखे नसून, ५ वर्षांनी आम्ही पुन्हा काँग्रेस-एनसीपी’सारखे एकत्र येणार किंवा नाही, हे आता सांगता येणार नाही,’ वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तेत आल्यापासून आम्ही केवळ भांडायचे म्हणून भांडत नाही आहोत आणि ते भांडण माझ्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या हिताचे आहे अशी पुष्टी सुद्धा त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना जोडली.

शिवसेना पक्ष प्रमुख सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पुढे बोलताना त्यांनी असं स्पष्ट व्यक्त केलं की, विद्यमान सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झालं आहे आणि शिवसैनिक म्हणून आमची भूमिका जनतेच्या सोबत राहणार आहे. समृद्धी महामार्गाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पाला दोन प्रकारचा विरोध होता,’जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अल्प मिळत होता. तसेच फळबागा व पूर्णपणे सुपीक जमीन देणार नाही, अशी भूमिका अनेकांची होती. त्यामुळे त्या ठिकाणी मार्ग बदलण्यात आला आणि अल्प मोबदला दिला जात असलेल्या ठिकाणी मोबादला वाढवून देण्यात आला.

दुसरीकडे नाणार हा विषय त्याहून वेगळा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात रिफायनरी येऊ घातली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणपट्टीतील पर्यायवरणाचा ऱ्हास होणार आहे, पण असा विध्वसंक विकास आपल्याला परवडणारा नाही. त्यामुळे येथील जनतेने तीव्र विरोध केला आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मुख्यमंत्र्यांना वेळ काढायचा असेल, तर काढूद्यात; पण नाणारला हा प्रकल्प होणार नाही,’ असे सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या