19 April 2025 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

राज ठाकरे व माझ्या कामाची 'स्टाइल' एकच, त्यामुळे आमची गट्टी होऊ शकते: बच्चू कडू

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड अभ्यासू आहेत आणि मी “फिल्ड वर्क’शी जोडलेला असल्याने भविष्यात त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीला माझ्या “फिल्ड वर्क’ ची जोड मिळाल्यास, राज ठाकरेंना सुद्धा राजकीय सूर गवसेल अशी आशा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

आमच्या पक्षांची ध्येय धोरण वेगळी असली तरी राज ठाकरे आणि माझ्या कामाची स्टाईल एकच असल्याने आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र येऊ शकतो असं संभाव्य भाकीत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सध्याच्या युती सरकारमध्ये आणि आघाडी सरकारमध्ये काहीच फरक नसल्याच सांगत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीमागील उद्देश हाच होता की, शहरी भागातील नैतृत्वाने ग्रामीण भागातील लोकांसाठी उभे राहावे आणि त्या निमित्तच माझी मनसे अध्यक्ष राज ठाकरें बरोबर सकारात्मक चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं. विद्यमान युती सरकार विरोधात लढण्यासाठी मी खूप गंभीर असून त्यासाठी अजून ६ ‘बच्चू कडूं’ची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं.

ग्रामीण भागातील लोकांसाठी शहरी नेतृत्त्व उभे राहावे, ही राज ठाकरे यांच्या भेटीचा उद्देश आहे. तशी सकारात्मक चर्चाही झाली. सरकारविरोधात लढण्यासाठी मी गंभीर आहे. मात्र, विधीमंडळात मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी आणखी सहा `बच्चू कडूं`ची गरज आहे. त्यांचा मी शोध घेत आहे. राज यांच्याबरोबर ग्रामीण भागातील लोकांसाठी शहरी नेतृत्व उभे राहील का याबाबत चर्चा झाली. ”

आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आपण जालन्यामध्ये रणशिंग फुंकणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. माझं उद्दिष्ट हे सत्ता मिळवणं नसून तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं आहे असं बच्चू कडू म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या