18 April 2025 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

सुप्रिया सुळेंचे तावडेंना आव्हान, मी काय खोटे बोलले ते सांगा?

पुणे : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागे आरोप केला होता की, राज्यातील शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात आहेत. त्यालाच अनुसरून खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आव्हान दिल की,’शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे’.

राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. शाळांचे समायोजन करताना सरकारकडून शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत असून शाळा बंद करताना सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही पर्यायांचा विचार केलेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिरूर तालुक्‍यातील भिल्लवस्तीमधील शाळा बंद करून सरकारने तेथील मुलांचे शिंदोडीतील शाळेत समायोजन केले आहे. परंतु, मुलांना शाळेत जाण्यासाठी एक-दीड किलोमीटर नव्हे, तर तब्बल ३ किलोमीटर पायपीट करत पोहोचावं लागणार आहे. बारामतीमधील गारमळा येथील विद्यार्थ्यांच सुद्धा तेच होणार आहे.

महाराष्ट्रातील असंख्य शाळा ग्रामस्थ, ग्रामपंचायती व जिल्हा परिषद यांचा विरोध असतानाही शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. परंतु त्यातून विद्यार्थ्यांची केवळ फरफट होणार असून, सरकारकडून ती फरफट दुर्लक्षित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासाचा विचार सरकारने “पालक’ म्हणून केलाय का?, असा प्रश्‍न खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

शाळा : समायोजन झालेली शाळा : अंतर (कि.मी)
बागलफाटा : बावडा : २.५
शास्ताबाद तालुका शिरूर: उकीरडेवस्ती : १.७
पवारवस्ती तालुका इंदापूर: वायसेवाडी : ०२
भिल्लवस्ती तालुका शिंदोडी : २.९
वेलहावळे तालुका खेड: काळोखेवस्ती : १.८

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या