23 February 2025 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य योजनेवर केंद्राकडून शिक्कामोर्तब | कसा घ्याल योजनेचा लाभ? - वाचा

India free food grains scheme

मुंबई, २४ जून | कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्याचे योजना राबवली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली होती. या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. मोफत अन्नधान्य वाटपाच्या योजनेचा देशभरातील 81 कोटी 35 लाख लोकांना लाभ होणार आहे. दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य योजनेअंतर्गत दिले जाईल. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेसाठी पात्र असलेल्या लोकांना योजनेनुसार पुढील पाच महिने मोफत धान्य मिळणार आहे.

योजना राबवण्यासाठी 67 हजार 266 कोटी रुपयांचा खर्च येणार असून तेवढा भारत सरकारच्या तिजोरीवर पडेल. जागतिक योग दिवसापासून म्हणजेच 21 जून पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून कोरोना वरील मोफत दिली जाणार असल्याची तसेच पाच महिलांसाठी मोफत अन्नधान्य दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जून रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात वेळी केली होती. कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे अशा स्थितीत गोरगरिबांची आबाळ होऊ नये याकरिता दिवाळीपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत अन्नधान्य वाटपाच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं होतं.

कसा घ्याल या योजनेचा लाभ ?

* तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही बँकेत आपले खाते उघडले पाहिजे.
* पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे.
* या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याकडे किती संपत्ती आहे हे सरकारला कळते.
* यानंतर, आपण खेड्यात राहत असल्यास आपल्याला ग्रामपंचायतीत जाऊन आपले नाव नोंदवावे लागेल.
* आपण शहरात रहात असल्यास आपल्याला पालिकेत जाऊन संपर्क साधावा लागेल.
* या योजनेत गरीब विभागातील लोक रेशनकार्डशिवायही मोफत धान्य घेऊ शकतात.
* याअंतर्गत गरजू लोकांना आधार कार्डमधूनच रेशन मिळते. तथापि, याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेंतर्गत तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल.
* नोंदणीनंतर तुम्हाला एक स्लिप दिली जाते. ही स्लिप दाखवून देखील तुम्हाला मोफत धान्य मिळू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Union seals free food grains scheme till Diwali see how to take advantage of the plan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x