वाघ दरवाजा - इतिहासास माहित नसलेला प्रसंग
९ फेब्रुवारी १६८९ येसाजी आणि सिदोजी फर्जंद यास कडेलोट केले..११ मार्च १६९ औरंगजेबाने तुळापुरी संभाजी राजे व कवी कलश यास जीवे मारून शिरच्छेद केला..२५ मार्च १६८९ औरंगजेबाने झुल्फिरखानास पाठवून रायगडास वेढा घातला….किल्ले रायगड च्या मावळतीकडे मोगली झुल्फिरखानच्या छावणीवर अजून सूर्यकिरण आले नव्हते.
किल्ले रायगडने टकमक टोक व हिरकणी टोक हे आपले दोन सव्य -अपसव्य बाहू पसरवून झुल्फिरखानाची छावणी रोखून धरली होती..कवटाळली होती..किल्ले रायगडच्या महादरवाजा कराल जबड्यापासून झुल्फिरखान सुदूर छावणी करून होता..झुल्फिरखानाला मावळतीकडील किल्ले रायगडचा एकच महादरवाजा माहित होता आणि तो त्याने रोखून धरला होता.
रायगडवाडी व पाचाड येथील मोघली छावणीतील अंमलदार अजूनही बिछायतीवर लोळत होते..दस्तुरखुद्द झुल्फिरखान सुद्धा पाचाड येथील आऊसाहेबांच्या कोटातील वाड्यात निजलेला होता..किल्ले रायगडला वेढा घालताना रायगडच्या बेलग कड्याची चहूअंगांनी मन ऊर्ध्वभागी झोकून पाहणी करतना प्रत्येक मोघली अंमलदाराची पागोटी रायगडच्या पायाखालील धुळीत पडून माखली होती गच्च रानातील वन्य श्वापदांचा भीतीने त्या अंमलदरांनी थातूर मातुर पाहणी केली होती..रायगडची उंची, सरळकोट भीषण तासीव कडे आणि सभोवतालचे घनदाट जंगल ध्यानात घेऊनच झुल्फिरखानने किल्ले रायगडची ज्ञात रहदारीची दरवाजाकडील बाजू आपल्या परीने रोखून धरली होती..
वाघ दरवाजाबाहेर एका चिकाच्या टोपल्यास दोरखंड बांधून ठेवलेला होता..वाघदरवाजा बाहेरील डोंगर धारेवर एक मेढ खोलवर पुरलेली होती ..मेढीच्या बेळक्यात दोरखंड टाकून टोपला डोंगर धारेवर सुरक्षित चार हशमांनी हातातील धरला..हश्मांचा आधार घेत संताजी घोरपडे टोपल्यात बसले..चार हशमांनी हातातील दोरखंड हळू हली ढिला सोडला ..टोपल्याच्या पालन उभ्या कडासी लगट करीत खाली खाली जाऊ लागला ..संताजी घोरपडे खाली उतरले ..घटकभरात रिकामा टोपला पालन वर ओढून घेतला होता ..तद्नानंतर त्या टोपला पाळण्यातून खंडेराव दाभाडे खाली उतरले..पालन पुन्हा वर येताच राजाराम महाराज पाळण्यात बसून खाली गेले..
त्यानंतर तारारानिसाहेब व राजसबाईसाहेब व अंबिकाबाईसाहेब एकापाठोपाठ एक टोपलीच्या पाळण्यातून खाली उतरल्या..अनुक्रमे प्रल्हाद निराजी ,खंडो बल्लाळ आणि बाबाजी निलो हेही वाघदरवाजा खाली पाळण्यातून खाली पोहोचले….वाघ दरवाजाखालील त्या किर्र रानात वाघांचे काळीज असणारीच माणसे उतरू शकली होती.. ..शिवरायाने दूरदर्शीपणे किल्ले रायगडास निर्मिलेल्या आपत्कालीन दरवाजा खानास ठाऊक नवता आणि म्हणूनच किल्ले रायगड वेढनाऱ्या झुल्फिरखान ह्याची ह्या दिशेला गस्त नावती .हे मराठ्यांच्या हेरांना ठाऊक होते..आजही तुम्ही सकाळी-दुपारी-सायंकाळी वाघ दरवाजात एकाकी गेलात तर आसमंतातील निर्व शांत तेच भंग करीत तो वाघ दरवाजा हि कथा सांगण्यास आपला जबडा उघडतो..
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- Home Loan | आता होम लोन रिजेक्ट होण्याची चिंता मिटली, या पर्यायांमुळे सोपं होईल सर्वकाही, लक्षात ठेवा - Marathi News
- CIBIL Score | सिबिल स्कोर 500 हून खाली घसरला असेल तर चिंता नको, या 5 गोष्टी वापरून वाढवता येईल - Marathi News
- NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News
- Bigg Boss Marathi | घराबाहेर पडताना पंढरीनाथ यांनी घेतला मोठा निर्णय, सुरजला अश्रू अनावर, वाचा सविस्तर - Marathi News
- Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News
- Home Loan EMI | गृहकर्जाचा डोंगर हलका करायचा असेल तर, या 9 स्टेप्स फॉलो करा, EMI सुद्धा होईल कमी - Marathi News
- Post Office Scheme | 10 लाखांचे 30 लाख होतील, बेस्ट ठरेल एक्सटेंड रूल, जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबद्दल - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोनवरील EMI आणि व्याजाच्या टेन्शनमधून व्हाल मुक्त, वापरा ही भन्नाट ट्रिक - Marathi News
- Bank FD Benefits | पगारदारांनो, बँक FD करत असाल तर पत्नीच्या नावाने खातं उघडा, मिळेल हा जबरदस्त फायदा - Marathi News
- Laapataa Ladies | 'लापता लेडीज' ने घेतली ऑस्करमध्ये एन्ट्री, किरण आणि अमीरचं स्वप्न झालं पुर्ण - Marathi News