महत्वाच्या बातम्या
-
२०१४ मधील व्यवहारावरून त्या म्हणाल्या | हे ऑफिस ऑफ ट्रस्ट की ऑफिस ऑफ प्रॉफिट?
अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते भाजपच्या नेत्यांसाठी देखील झगडताना दिसले नसतील तितकी बोंबाबोंब सध्या ते आता करताना दिसत आहे. त्यासाठी ते कोणत्याही अर्थहीन विषयाचा संबंध अन्वय नाईक आणि अर्णब प्रकरणाशी जोडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील समाज माध्यमांवर अन्वय नाईक कुटुंबियांच्या राहणीमानावरून त्यांना लक्ष केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
लोकशाहीचं रक्षण करा | लोकशाहीला कधीही गृहित धरु नका - अमृता फडणवीस
अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन विराजमान होणार आहेत. २० जानेवारी २०२० रोजी ते अधिकृतपणे व्हाईट हाऊसची सूत्र हाती घेतील. याच निवडणुकीत दुसऱ्याबाजूला अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाचा मान एका महिलेला मिळण्याचा इतिहास भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी देखील रचला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यासंदर्भातील एका व्हिडिओला रिट्विट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजनेत देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय - अमृता फडणवीस
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तब्बल ३ तास चौकशी करण्याची परवानगी कोर्टाने पोलिसांना दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जनतेने या सरकारला निवडून दिलेलं नाही | तरीही खुर्ची मिळाली आहे - अमृता फडणवीस
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV editor Arnab Goswami) यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला (Mumbai High Court rejected Interim bail to Arnab Goswami). त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पीडित नाईक कुटुंबियांसाठी ना दुःख ना आस्था | पण अर्नबच्या पायात त्यांना बरेच फोड दिसले
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? | अमृता फडणवीसांची टीका
मुंबईत शहरातील मेट्रो ३ कारशेडच्या कांजूरमार्ग येथील जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद उफाळून आला आहे. या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्गच्या जागेवरुन भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. आमदार आशिष शेलार यांच्या टीकेचा व्हिडीओ रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि पेंग्विन महा सरकार | हे दोन व्हायरस निष्पाप लोकांवर कधीही....
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. करोना विषाणू आणि पेंग्विन महा सरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांवर ग्रासतील हे सांगता येत नाही, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी AXIS बँकेसाठी 18 वर्ष काम केले | दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि परिश्रम कसे समजतील?
मुंबई पोलिसांची पगार खाती ‘अॅक्सिस बँके‘तून ‘एचडीएफसी’मध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे ट्विटरवर वाकयुद्ध रंगले. दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? अशा शब्दात मिसेस फडणवीसांनी चतुर्वेदींना टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
माझ्याकडे घर ना दार म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांची मालमत्ता पहा किती कोटीची
मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून लिहलेले पत्र आणि त्या पत्राला ठाकरेंनी दिलेले उत्तर यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
4 वर्षांपूर्वी -
माझ्याकडे ना घर ना दार | मग बुल्डोजर सरकार पाडणार काय? - अमृता फडणवीस
मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून लिहलेले पत्र आणि त्या पत्राला ठाकरेंनी दिलेले उत्तर यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
4 वर्षांपूर्वी -
पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्यांना भविष्यात कुणी किंमत दिली नाही - रुपाली चाकणकर
आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी याची घोषणा केली. मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
मग पोलिसांची बँक खाती AXIS बँकेत वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा?
आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी याची घोषणा केली. मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
अर्थात प्रमाणपत्राची गरज लागते | अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लेटर वॉर सुरू आहे. हिंदुत्वाची आठवण करून देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी ‘माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही,’ अशा शब्दांत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या संघर्षावर प्रतिक्रिया आल्या. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
खात्री बाळगा, अशी चूक करणार नाही | अमृता फडणवीस यांचा खडसेंना टोला
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली. मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसे यांनी केला होता. यास आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत | राऊतांना सणसणीत टोला
मुंबई पोलिसांवर अभिनेत्री कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर हा शब्द वापरला होता. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी सोमवारी दिलं. अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं म्हणत त्यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला आहे. त्यांच्या या स्पष्टिकरणावर अमृता फडणवीस यांनी राऊतांचं नाव न घेता निशाणा साधला आहेत. आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त खट्ट्याळ आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकशाहीत व्यक्त होण्याचा अधिकार सर्वांना | पोस्टरला चपलांनी मारण हे काही योग्य नाही
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर चांगल्याच आक्रमक झालेल्या कंगना रानौत आणि शिवसेनेमध्ये सध्या तुंबळ शाब्दिक लढाई जुंपली आहे. त्यात कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान आज दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू होते. तर कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली असून, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी कंगना रानौत हिची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपचं सरकार आल्यावर आपला उदय झाला, तत्पूर्वीचे आपले महान कार्य राज्यापुढे नाही
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले जात आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन मुंबई पोलिसांवर टीकास्त्र सोडलं होतं. मुंबईत राहणं असुरक्षित वाटत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण: अमृता फडणवीस यांची पुन्हा अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका
असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावं असं शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीस यांनी तपास ज्याप्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब यांनी टीका केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
खुर्ची गेल्याची तडफड होतेय, असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटतंय? - अनिल परब
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. आज अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारले आहे. रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करु नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हा तुम्ही मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं, असा टोला रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये, असं मत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस मुख्यमंत्री असताना असं घडलं असतं तर मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं - रेणुका शहाणे
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. असं असताना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी यांनी ‘मुंबई सुरक्षित नाही’ असं म्हणतं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर ट्विट केलं आहे. या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल