महत्वाच्या बातम्या
-
दक्षिण मुंबईत काँग्रेसला धक्का! मिलिंद देवरा पराभूत: सेनेचे अरविंद सावंत विजयी
काँग्रेसला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून जोरदार धक्का मिळाला आहे. कारण इथून मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी पराभव केला आहे. या मतदारसंघातून मिलिंद देवरा निवडून येतील आणि ही लोकसभेची जागा काँग्रेसच्या भरोशाची मानली जात होती. काहीसा उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू समाजातील लोकांचा मतदारसंघ म्हणून सर्वांना परिचित असलेला हा मतदारसंघ समजला जातो.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर लोकसभा: नितीन गडकरी विजयी; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दारुण पराभव
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे नितीन गडकरी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नांदेड: काँग्रेसचे अशोक चव्हाण पराभूत; भाजपचे चिखलीकर विजयी
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून पहिल्यांदा उमेदवारी घेणारे प्रतापराव चिखलीकर आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवाचं मूळ कारण ठरलं आहे ते वंचित आघाडीच्या उमेदवाराने घेतलेली मतं असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ होण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे समोर येत आहेत त्यातून विरोधकांची दयनीय स्थिती समोर येते आहे. त्यातून महाराष्ट्रातील काँग्रेसचा राज्यातून सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. देशातील मोठी पारंपरिक मतदार असलेला काँग्रेस पक्ष केवळ देशात नव्हे तर राज्यात देखील शेवटच्या घटका मोजत आहे अशी परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या अंतर्गत एक्झिट पोलमध्ये एनडीए'ला २३० तर भाजपाला २०० पेक्षा कमी जागा
लोकसभा निवडणुकीसाठीचे ७व्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या संस्थांनी आपापली एक्झिट पोल जाहीर केली होती. या एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीए बहुमतापर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने देखील एक्झिट पोल घेण्यात आले असून, या एक्झिट पोलमध्येही भाजपाप्रणित एनडीएला यूपीएपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला २०० हून कमी जागा मिळतील आणि एनडीएला केवळ २३० जागांवर मजल मराटग येईल. तर काँग्रेस स्वबळावर १४० जागा जिंकेल आणि यूपीएला १९५ जागा मिळतील, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
एनडीए सरकार जाणं महत्वाचं; पंतप्रधान इतर पक्षाचा होण्यास आमची हरकत नाही: काँग्रेस
लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतरची आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर पुढील सरकारचे नेतृत्व काँग्रेस करेल. परंतु युपीएच्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या बाजूने सहमती नसेल तर दुसऱ्या कोणत्या पक्षाचा पंतप्रधान बनू देणार नाही, अशी भूमिका काँग्रेस घेणार नसल्याचं यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी, शहांना निवडणूक आयोग शरण: काँग्रेसचा थेट आरोप
कोलकाता येथे मंगळवारी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी आणि जाळपोळ झाली. दरम्यान, या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या एकतर्फी भूमिकेवरून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर अक्षरशः शरणागती पत्करली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारावर एक दिवस आधीच बंदी घालण्याचा निर्णय हा पूर्णपणे घटनाविरोधीत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राधाकृष्ण विखेंच्या विविध संस्थांमधील घोटाळ्याप्रकरणी भावाचे उपोषण?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे हे उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, विखे-पाटील कुटुंबियांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधील अनेक प्रकरणांच्या चौकशीची मागणी डॉ. अशोक विखे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन पाठवून येत्या २० मे रोजी लोणी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुतळ्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सामान्यांचे प्रश्न घेऊन निवडणूक लढलो, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल: राहुल गांधी
सामान्य जनतेशी निगडीत असलेले महत्वाचे प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक आणि सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी प्रसार माध्यमांना दिली. नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत मताधिकार बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
6 वर्षांपूर्वी -
राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक: प्रियांका गांधी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय राजकारणात एण्ट्री केली आहे. त्यांच्या एण्ट्रीने उत्तर प्रदेशच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होणार, याबाबत आता जोरदार चर्चाही यापूर्वीच सुरू झाली आहे. आता प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवेशाच्या ‘टायमिंग’वर भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचे कुटुंब असते तर तेही सहलीला गेले असते: आनंद शर्मा
राजीव गांधी यांनी जे केले तेच कोणत्याही पंतप्रधानाने केले असते. पण सध्याच्या पंतप्रधानांना कुटुंबच नाही. ते असते तर तर मोदीही तिथे गेले असते. आता ते एकटेच जातात कारण त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संबंध नाही आणि त्यांना कुटुंबाबद्दल आदरही नाही, अशी खोचक टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर राहुल गांधींचे स्पष्टीकरण, त्यांनी माफी मागायला हवी
साल १९८४ साली दिल्लीत झालेली शीख दंगलीप्रकरणी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शीख समुदायात संताप निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. शीख समुदायाने दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घराबाहेर आंदोलन करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली.
6 वर्षांपूर्वी -
भाजप कार्यकर्त्यांचे स्टंट! रॉबर्ट वाड्रा मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले तिथेही मोदींच्या नावाने घोषणा
भारतीय जनता पक्षाच्या उतावळ्या कार्यकर्त्यांचं आजदेखील पुन्हा दर्शन झालं. एखादी गोष्ट कोणत्या ठिकाणी करावी याचं देखील त्यांना भान नसतं असाच काहीसा प्रकार आज घडला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं मतदान देखील पार पडलं आहे. मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आज मुंबईतील सुप्रसिद्ध मुंबादेवीचे दर्शन घेतले. परंतु वाड्रा दर्शनानंतर परतत असताना मंदिराच्या आवारातील काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. यावेळी प्रसार माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी राजकीय विषयावर बोलण्यास नकार दिला.
6 वर्षांपूर्वी -
मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकतं, जॅमर बसवा: अशोक चव्हाण
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोबाईल टॉवरद्वारे ईव्हीएम टेम्परिंग होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोगाने या क्षेत्रात मोबाईल जॅमर बसवावे, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा मतदान पाचवा टप्पा;आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील एकूण ५१ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात ६७४ उमेदवारांचे भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत. अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रायबरेलीमधून सोनिया गांधी, लखनऊमधून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी बडे नेतेमंडळी रिंगणात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आता बोलून टाका! उरी, पुलवामा व गडचिरोलीतील घटनेला पण नेहरू जबाबदार: नेटिझन्स
उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९५४ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला उजाळा देत त्याचे खापर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फोडले. मोदी प्रचारात मूळ मुद्दे सोडून प्रत्येक विषयात नेहरू आणि गांधी घराण्याला ओढत असल्याने आता नेटकरी देखील संतापल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील कोणत्याही नकारात्मक गोष्टीला केवळ नेहरूच जवाबदार असतात, त्यामुळे देशात घडलेल्या उरी, पुलवामा आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यामागे देखील नेहरूंचा हात असून तेच या गंभीर घटना जवाबदार असल्याची उपहासात्मक टीका सध्या समाज माध्यमांवरील नेटकरी करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांना उमेदवारी
पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वारणसीमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. काँग्रेसने वाराणसीतून प्रियंका गांधी यांना नाही तर अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ निवडणुकांमध्ये मोदींविरोधात अजय राय रिंगणात उतरले होते.
6 वर्षांपूर्वी -
नेहरु-गांधी कुटुंबीयांना लक्ष करण्यापेक्षा तुमची ५ वर्षातील कामं सांगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातील अर्ध्यापेक्षा जास्त वेळ गांधी आणि नेहरु परिवारावर टीका करण्यात घालवतात. नरेंद्र मोदींचे भाषण गांधी कुटुंबावर केंद्रीत असते. फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. परंतु, ५ वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीकरीमध्ये प्रियंकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. फतेहपूर सीकरीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेत प्रियंका गांधी बोलत होत्या.
6 वर्षांपूर्वी -
उर्मिलाच्या हटके प्रचारामुळे गोपाळ शेट्टींना सारखे मोदी-मोदी-मोदी इव्हेंट करण्याची वेळ?
काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा झंझावाती प्रचार सुरू आहे. उर्मिलाच्या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले. भयभीत झालेल्या गोपाळ शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा उर्मिलाच्या प्रचार रॅलीत मोदी…मोदीच्या घोषणा दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या घोषणाकडे दुर्लक्ष केल्याने नवा संघर्ष टळला.
6 वर्षांपूर्वी -
दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
देशभरात आज आगामी लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १३ राज्यांतील ९७ जांगावर १८ एप्रिलला मतदान होत आहे. महाराष्ट्रात बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC