महत्वाच्या बातम्या
-
चौकशीच्या महत्वाच्या टप्प्यात NCB प्रमुख मुंबईत आढावा बैठक घेऊन पुन्हा दिल्लीला?
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाचा संबंध ड्रग्स कनेक्शनशी असल्याच स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती आणि ही चौकशी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना करत होते. पण आता अशी माहिती मिळाली की राकेश अस्थाना पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. अस्थाना रवाना झाले असले तरीही कुणालाही क्लीन चिट मिळालेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
खोट्या कागदपत्रांद्वारे ट्रॅफीक पोलिसांना फसवणं विसरा | तुमची सर्व कागदपत्रं पोलिसांकडे
गाडी चालवताना खोटे कागदपत्र दाखवून ट्रॅफीक पोलिसांकडून सुटका करता येऊ शकते असा अनेकांचा गैरसमज आहे. बऱ्याचदा पोलिसांकडून कागदपत्रांची सत्यता पडताळणी होत नाही हे सत्य आहे. पण यापुढे असं होणार नाही. आता वाहतूक पोलिसांकडे तुमची कागदपत्रे आधीच असतील.
5 वर्षांपूर्वी -
सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं?
सध्या अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीवर सुशांत सिंह राजपूत प्रकरण जोरदारपणे दाखवले जात आहे. मात्र, या सर्वांमध्ये ‘सत्य सोडून बाकी सारं’ दाखवलं जात असल्याचा आरोप करत महिला पत्रकाराने राजीनामा दिला आहे. काय म्हटलंय या पत्रकारान
5 वर्षांपूर्वी -
Swachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.
5 वर्षांपूर्वी -
पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन
पंडित जसराज यांचं निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. अमेरिकेत त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती आहे. पं. जसराज यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. ते मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडित मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती.
5 वर्षांपूर्वी -
स्थलांतरित मजुरांच्या हातात फक्त १३% मोफत धान्य, महाराष्ट्र- गुजरातमध्ये १% वितरण
लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये याकरता केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवली जाते आहे. या योजनेअंतर्गत लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. या योजनेचा ८० कोटी नागरिकांनी लाभ घेतल्याचे नुकतेच पंतप्रधानांनी घोषित केले. मात्र मे आणि जून महिन्यात केवळ १३ टक्केच धान्य प्रवासी मजुरांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी अहवालातूनच ही माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
टिकटॉक स्टार्सना बेरोजगारीची जाणीव होणार, टिकटॉक सह अनेक चायनीज अँप्स भारतात बॅन
भारतीय तरुणाई त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ निरनिरळ्या अँप’मध्ये वाया घालवत असल्याचं समोर आलं आहे. देशात एक आधुनिक बेरोजगारीचा प्रकार तोंडवर काढत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. केवळ नकोत्या फिल्मी चमकोगिरीसाठी तरुण-तरुणी त्यांच्या आयुष्यातील अमूल्य वेळ TikTok सारख्या अँप’वर वाया घालवत असून त्याचे भविष्यात अनेक तोटे समोर येण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
TikTok देशभक्त, चिनी कंपनीच्या लेटेस्ट मोबाइलला तुफान प्रतिसाद
भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी विविध स्तरावर होत आहे. सोशल मीडियावर अशा आशयाचं आवाहन केलं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट चित्र दिसून येतंय. चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनसाठी काल (दि.18) भारतात सेल आयोजित करण्यात आला होता. अॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला भारतीय ग्राहकांचा मात्र शानदार प्रतिसाद मिळाला आणि हा सेल सुरू झाल्यानंतर हा फोन काही मिनिटांमध्येच ‘सोल्ड आउट’ झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण झालेला आमदार मतदानासाठी विधानसभेत प्रकटला आणि...
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आज अनेक राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. पण Coronavirus च्या पार्श्वभूमीवर चोख तयारी करूनच मतदान सुरू आहे. मध्य प्रदेशातले काँग्रेसच्या एका आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Covid-19 पॉझिटिव्ह असतानाही ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले.
5 वर्षांपूर्वी -
ओप्पोकडून नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँचिंग इव्हेंट रद्द
लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान हिंसक झडप नंतर सुरक्षा दलाचे तिन्ही दल पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार चीनला दिलेलं टेलिकॉम उपकरणांचं मोठे कंत्राट रद्द करणार
भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. दोन्हींकडून सीमेवर आक्रमकता पाहायला मिळाली आहे. चीनकडून सीमेवर हिंसक झडप घातल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. केंद्र सरकारने सरकारी आणि खासगी कंपन्यांत चिनी उपकरणे वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील चिनी उपकरणे वापरण्यास सरकारने बंदी घातली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात KG ते इयत्ता ५'वीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी
एकिकडे कोरोना विषाणूमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेपासून थेट शिक्षण व्यवस्थेपर्यंत थेट परिणाम होत असतानाच दुसरीकडे या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी म्हणून बहुविध मार्ग अवलंबले जात आहेत. शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत सांगावं तर, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी अनेक राज्यांनी ऑनलाईऩ शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारने कोरोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला - उद्योगपती राजीव बजाज
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी उद्योगपती राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या वेबसंवादात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे.
5 वर्षांपूर्वी -
पावसामुळे पहिल्याच दिवशी आसाममध्ये भुस्खलन, २० जणांचा मृत्यू
आसाम राज्यात पावसामुळे झालेल्या भुस्खलनात २० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी आसामच्या बराक घाटी प्रदेशातील ३ जिल्ह्यांत हे भुस्खलन झाले. यात २० जण ठार झाले असून अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा नवा भारत क्षमतेच्या तुलनेत कमी वृद्धी करतोय; Moody`s ने रेटिंग घटवलं
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली आहे. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही.
5 वर्षांपूर्वी -
मान्सूनचं केरळ किनारपट्टीवर आगमन, लवकरच महाराष्ट्रात धडकणार
भारतात मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ९ मे रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळतच गेली. काही दिवसानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. नंतर ते कोमात गेले होते.
5 वर्षांपूर्वी -
ओडिशा, प. बंगालला २४ तासात अम्फान या मोठ्या चक्रीय वादळाचा इशारा
भारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्ली हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, अम्फान या वादळाचं १२ तासांत सुपर चक्रीवादळ रुपांतरण होईल. ते आता उत्तर-ईशान्यच्या दिशेने सरकत असून, २० मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी ते दिघा / हटिया बेट पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मान्सूनचं आगमन ४ दिवस उशिराने, केरळमध्ये ५ जूनला दाखल होणार
उकाड्यानं हैराण झालेले नागरिक आणि बळीराजा भाताच्या पेरणीसाठी मान्सूनची आतूरतेनं वाट पाहात असतो. मान्सून वेळत आला तर शेतीची कामं योग्य मार्गी लागतात. मान्सून येण्यास विलंब झाला तर पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असते. जून ते सप्टेंबर या कालावधित चांगला पाऊस होणं हे पाणी शेतीच्या दृष्टीनं फायद्याचं असतं. दक्षिण भारतातून मान्सून उत्तरेकडे येत असतो. यंदा मान्सून ४ दिवस उशिरानं येणार आहे. १ जून ऐवजी ५ जूनला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होणार; शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी
एकीकडे कोरोना विषाणू संक्रमणामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि दुसरीकडे वाढत्या पाऱ्यामुळे घरात असलो तरी उकाड्याने जिवाची घालमेल होत असताना एक सुखावणारी बातमी आली आहे. देशात यंदाही सरासरी इतकाच पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नोंदविला आहे. जूनपासून देशात पावसाळ्याला सुरुवात होते. त्याआधी दोन ते तीन वेळा हवमानशास्त्र विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येतो. बुधवारी पहिला अंदाज वर्तविण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC