महत्वाच्या बातम्या
-
Manipur Violence | मणिपूरमधील पीडित महिला भाजपाचं डबल इंजिन सरकार असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात
Manipur Violence | मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न अवस्थेत परेड केल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात या घटनेनंतर भाजप आणि मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त होतं आहे. केंद्र सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. दोन्ही पीडितांनी केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपली ओळख उघड करू नये, अशी मागणीही या महिलांनी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूरमध्ये क्रूरतेचा उच्चांक, आता 80 वर्षीय महिलेला जिवंत जाळले, मुलाचा पंतप्रधानांवर संताप
Manipur Violence | मणिपूरच्या मातीतून वाईट कथा येत राहतात. आता मे महिन्याच्या अखेरीस एक घटना घडली आहे, जिथे एका 80 वर्षीय महिलेला तिच्या घरात जिवंत जाळण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. आता पीडितेच्या मुलाने या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. राज्यात दोन महिलांना नग्न अवस्थेत फिरवल्याचा व्हिडिओ यापूर्वीच समोर आला होता. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर हिंसाचारात लाखो घर-संसार उध्वस्त, मुलांच्या शाळाही जळून राख, महिलांचा रोष रस्त्यावर
Manipur Violence | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर हिंसाचारात लाखो घर-संसार उध्वस्त आली असून मुलांच्या शाळाही जळून राख झाल्याने महिलांचा रोष आता रस्त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी दिसत नसल्याने सर्व रोष सुरक्षा यंत्रणांवर व्यक्त होतं असल्याने परिस्थती अजून गंभीर होऊ लागली आहे. विशेष म्हणजे मागील ५० दिवस संपूर्ण राज्य दंगल आणि हिंसाचाराने जळत असताना देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्द काढलेला नसल्याने भाजप विरोधात रोष विकोपाला पोहोचल्याच स्थानिक वृत्त वाहिन्या सांगत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | 50 दिवसांपासून मणिपूर मध्ये हिंसाचार, अनेक चर्च आणि हजारो झोपड्या, फ्लॅट, बंगले जाळले, हजारो लोकं बेघर
Manipur Violence | सीमावर्ती मणिपूर राज्यात दीड महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मणिपूर गेल्या ५० दिवसांपासून जळत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप देशातील प्रमुख विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी आपल्या कर्तव्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | मणिपूर दंगलीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, केंद्रीय मंत्र्याने आपल्याच सरकारबद्दल केलं विधान
Manipur Violence | देशाच्या ईशान्य भागातील मणिपूर या राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. तेथील परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे आरोप कोणत्याही विरोधी पक्षनेत्याने केलेले नाहीत, तर एका केंद्रीय मंत्र्याने केले आहेत. तेव्हा मणिपूरमध्ये विरोधी पक्ष नसला तरी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपच सरकार चालवत आहे.
2 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर'मध्ये महिना उलटूनही दंगल थांबेना, हजारो बेघर-शेकडो मृत्युमुखी, मोदी सरकारमधील मंत्र्यांचे बंगले पेटवायला सुरुवात
Manipur Violence | मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत, तसेच भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूरमध्ये महिना उलटूनही दंगल थांबेना आणि त्यात हजारो लोकं बेघर झाली असून शेकडो लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. परिणामी जनतेमध्ये भाजपविरोधात प्रचंड रोष उफाळून आला असून मणिपूरमधील भाजपच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यास सुरुवात झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | मणिपूर मध्ये पुन्हा दंगली भडकल्या, कूकी गावात सकाळ होताच तिघांची हत्या, भाजपविरोधातही रोष शिगेला
Manipur Violence | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळण्याची शक्यता आहे. कांगपोकपी जिल्ह्यातील कुकी गावात शुक्रवारी पहाटे एका वृद्ध महिलेसह तिघांची जमावाने हत्या केली आहे. हल्लेखोरांनी पोलिस आणि आयआरबी (इंडिया रिझर्व्ह बटालियन) चा गणवेश परिधान केला होता, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी नुकतेच म्हटले होते की, 48 तास हिंसाचार थांबला होता, पण आता पुन्हा उफाळून आला आहे . गेल्या महिनाभरापासून मणिपूरमध्ये जातीय संघर्ष सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
अमित शहांच्या मणिपूर भेटीनंतर 2 दिवसांनी पुन्हा दंगली भडकल्या, 3 नागरिक ठार, जमावाने भाजप आमदारचं घर जाळून टाकलं
Manipur Violence | मणिपूरमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अशांततेनंतर शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 105 वर पोहोचला आहे. मैतेई आणि कुकी समाजातील संघर्ष थांबताना दिसत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले
Manipur Violence | मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी गृहमंत्री अमित शहा आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते मुख्यमंत्री एन बीरेन सिंह आणि अन्य मंत्र्यांसोबत बैठक करतील. या अडचणीत हिंसाचार आणि सामंजस्याला सामोरे जाण्याचा मार्ग काय असू शकतो यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Manipur Violence | मणिपूरमध्ये पुन्हा दंगली उसळल्या, पुन्हा संचारबंदी लागू, सैन्यदल पुन्हा परतलं
Manipur Violence | ईशान्येकडील मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. परिस्थिती पाहता शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली असून सैन्य दलाच्या जवानांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. हिंसाचारग्रस्त शहरात काही दिवसांच्या शांततेनंतर सोमवारी दुपारी पुन्हा दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी आणि जाळपोळ झाली.
2 वर्षांपूर्वी -
मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारा, दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश, भाजप आमदाराविरोधातही हिंसाचार, आणीबाणीसदृश परिस्थिती
Manipur Violence | मणिपूरमध्ये आदिवासी आणि मैतेई समाजातील हिंसाचारामुळे राज्यात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली असून 5 दिवस मोबाईल इंटरनेट बंद आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी गृहमंत्री अमित शहा देखील बैठका घेत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की, अनेक भागात राज्य पोलिसांबरोबरच लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. दंगलखोरांनाही पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने एकीकडे लोकांनी भाजप आमदारासोबत हिंसाचारही केला आहे. जाणून घेऊया मणिपूर मध्ये काय चाललंय.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC