महत्वाच्या बातम्या
-
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार व डेटा असुरक्षित असताना सुद्धा ऍक्सिस'मध्ये खाती का? गृहखातं चौकशी करणार?
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेक खात्यांमधील अनियमितता विषयावरून चौकशीचा फेरा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला “कमिशनसाठी” असा शब्द वापरत लक्ष केलं आहे. मात्र यात अमृता फडणवीस याना गोष्टीचा विसर पडल्याचं दिसत आहे. त्याला मूळ कारण होऊ शकतं ऍक्सिस बँकेविरुद्ध सुरु असलेले न्यायालयीन खटले आणि डेटा असुरक्षितता या गंभीर विषयावरून स्वतः UIDAI’ने दाखल केलेले फौजदारी तक्रारी तसेच ईडी’मार्फत चौकशी सुरु करण्याची न्यायालयात करण्यात आलेली याचिका म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे, लवकर बऱ्या व्हा; प्रियांका चतुर्वेदींचा अमृता फडणवीस यांना टोला
औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
महापोर्टल'मार्फत होणाऱ्या सरकारी भरतीला स्थगिती; पण महाराष्ट्रनामा'वर मोफत अभ्यास सुरु ठेवा
अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच या ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यात अनेक निवेदनं आणि आंदोलनं करून देखील फडणवीस सरकारने याची दखल घेतली नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला? पवारांच्या त्या टीकेमुळे १० रुपयात थाळी बोंबलणार?
राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या १० रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला होता. त्यावेळी एका सभेतील प्रचारात तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला होता. विधानसभा निवडणुकीच्या बार्शी येथील प्रचारसभेत पवारांनी शिवसेनेच्या त्या घोषणेवर टीका केलो होती.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणे उद्धव ठाकरेंना वांद्रयात जाऊन उत्तर देणार होते; मग गाडी अडली कुठे?
लोकसभा निवडणुकीनंतर आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात राजकीय युद्ध पेटलं होतं. नारायण राणे यांना शिवसेना सोडून अनेक वर्ष झाली असली तरी उद्धव ठाकरे आणि राणे कुटूंबातील वाद क्षमण्याची शक्यता नाही. विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गमधील प्रचारादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वादाला मोठं तोंड फोडलं होतं आणि त्यानंतर खासदार नारायण राणे देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं होतं. कारण उद्धव ठाकरे यांनी थेट कोकणात सभा घेऊन नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार: मुख्यमंत्री
काल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती. आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण वर्षे ज्या चाळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालवली. तिथून जिथे त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला, जिथून ते वर्ल्ड टेबल कॉन्फरन्सला (गोल्मेज परिषदेला) गेले. जिथे त्यांना छत्रपती शाहू महाराज भेटले. त्या खोलीचे व त्या इमारतीचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
महापरिनिर्वाण दिन- राज्यपाल, मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
नगरविकास खात्यावरून फडणवीस यांनाच 'ठाकरे दणका'; घाई गडबडीतील निर्णयांना स्थगिती
फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळाच्या अनेक तातडीच्या बैठका घेऊन निर्णयांचा सपाटा लावला होता. त्यातल्या नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिलीय. त्याबाबतचे आदेश आज काढण्यात आलेत. स्थगित केलेले सर्व निर्णय हे नगरविकास विभागाचे असून ते खातं हे देवेंद्र फडणवीसांकडेच होतं. त्यामुळे हा त्यांना दणका असल्याचं मानलं जातंय. ज्या कामांचे आदेश निघाले आणि निधी मंजूर झाला त्याची यादी तातडीने पाठवावी आणि ज्याचे आदेशच निघाले नाहीत त्यावर पुढील आदेशापर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये असे निर्देशही नव्या आदेशत देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दणका! पक्षपात करून भाजप आमदारांना मंजूर केलेल्या अनुदानाच्या कामांवर गंडांतर
नव्या सरकारने फडणवीसांनी तडकाफडकी घेतलेल्या सर्व निर्णयांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यानुसार माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे व सोलापूर जिल्ह्यातील नेते कल्याणराव काळे यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने (Former Chief Minister Devendra Fadnavis) ३१० कोटी रुपयांची बँकहमी देण्याचा निर्णय रद्द करण्याचा विचार उद्धव ठाकरे सरकार (Chief Minister Uddhav Thackeray) आधीच घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी या २ नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालिन सरकारने मदतीचा निर्णय घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे-पवार दणका! भाजपने स्वपक्षासंबधित साखर कारखान्यांना दिलेली ३१० कोटीची हमी रोखणार?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि राजकीय हेतूने फडणवीस सरकारने भारतीय जनता पक्षाशी संबंधित साखर कारखान्यांवर आर्थिकदृष्ट्या संकटात असल्याचा बहाणा करत तब्बल १५ सहकारी साखर कारखान्यांना राजगोपाल देवरा समितीच्या (Rajgopal Deora Commission) शिफारशींच्या नावाखाली आर्थिक मदतीची खैरात केली होती. तसा अधिकृत निर्णयच फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तडकाफडकी जाहीर केला होता आणि त्यासाठी मंत्रिमंडळ बैठक देखील बोलावली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा आरोप अनेक विरोधकांनी केला होता.
5 वर्षांपूर्वी -
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र (NCP MLA Dhananjay Munde wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray) लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Bhima Koregaon Riots).
5 वर्षांपूर्वी -
आरोप करून अज्ञातवासात जाणारे किरीट सोमैया टीआरपी'साठी पुन्हा प्रकटले? सविस्तर वृत्त
राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. मात्र तिळपापड झालेले भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेविरोधात आग ओकण्यास सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. किरीट सोमैय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, शिवसेनेने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे असं म्हणत जहरी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे दणका! गुजरातच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचं ३२१ कोटीचं कंत्राट रद्द
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या निर्णयांना धक्का देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर गुजरातमधील कॉन्ट्रॅक्टर दिल्लीवाया राज्यात एकामागे एक कॉन्ट्रॅक्ट खिशात टाकत होते. त्यात भारतीय जनता पक्ष केवळ मोदी-शहा असं गणित झाल्याने महराष्ट्रातील नेते मंडळी तिकडून येणारे आदेश पाळण्यासाठीच बसले होते का अशी चर्चा यापूर्वीच विरोधकांनी केली होती. मात्र आता सत्तापालट झाली आहे आणि फडणवीसांच्या गुजरात धार्जिण्या निर्णयाला केराची टोपली दाखविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना जमलं नाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं; नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे
कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प राज्यात विविध आंदोलनामुळे चर्चेत होता. स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले फडणवीस यांनी मात्र स्वतःच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नाणारवासियांवर गुन्हे दाखल केल्याने कोकणात भारतीय जनता पक्षाबद्दल खदखद होती आणि त्याची झळ थेट युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेला देखील बसली होती.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारने दडपशाही करून गुन्हे लादले होते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागे घेतले
फडणवीस सरकारने दडपशाही मार्गाने आरे’तील आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर धडाडीने निर्णय घेण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आरे’तील वृक्षतोडीला विरोध करत अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शपथविधीत महापुरुषांची नावं घेणं गुन्हा असेल तर तो गुन्हा मी पुन्हा करेन: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राऊत जिंकले भाजप हरली! 'आम्ही १६२' नाही तर १६९ मतांनी महाविकास आघाडीचं बहुमत सिद्ध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बहुमत चाचणी; भाजप आमदारांची घोषणाबाजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर: चंद्रकांत पाटील
उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सहा आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु आता या शपथविधी सोहळ्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. तसंच याविरोधात राज्यपलांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी -
आज महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Chief Minister Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, त्यासाठी शनिवार आणि रविवार असे २ दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL