महत्वाच्या बातम्या
-
पोलखोल व्हिडिओ; २००९ मध्ये राम मंदिर मुद्दा महत्वाचा नव्हता, पण सत्तेत आल्यावर विकास फसताच राम मंदीर?
सध्या देशात भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत महागाईने शिखर गाठलं असताना शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून सुरु आहे अशी परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
खोटे बोलण्यात ते पटाईत; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिर्डी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला. माझ्या रक्तातच लाचारी नाही आणि मी सत्तालोलूप सुद्धा नाही, पण तुम्ही तर चक्क खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा औढा देशद्रोहच आहे, अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर प्रहार केले.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिर मुद्दा: २ निवडणुकीतील शिवसेनेची दुटप्पी भूमिका लवकरच उघड करणार
सध्या देशात भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत महागाईने शिखर गाठलं असताना शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार आणि शिवजल योजनांचं ग्रामीण भागाला मृगजळ दाखवून पुन्हा तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची आलेली वेळ, पेट्रोल-डिझेलचे वाढणारे भाव, डॉलरच्या तुलनेत कोसळणारी रुपयाची किंमत या सर्व विषयांपासून सामान्य लोकांना विचलित करण्यासाठी सगळं ठरवून सुरु आहे अशी परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाणे महापालिकेचा आता ‘टीएमटी’ घोटाळा? त्यामुळे शिवसेनेकडून चर्चेशिवाय प्रस्ताव मंजूर
शिवसेनेची सत्ता असलेली ठाणे महानगरपालिका सत्ता घोटाळ्याच्या गरत्यात अडकण्याची चर्चा रंगली आहे. त्यात काल म्हणजे शनिवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात सुरू असलेल्या चर्चेत आलेला हा प्रस्ताव अधिक वादाच्या भोवऱ्यात सापडत असताना सत्ताधारी शिवसेनेने गोंधळ घालून चर्चेशिवाय हा संपूर्ण प्रस्ताव मंजूर केल्याने घोटाळ्याचा संशय अधिक बळावला आहे असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना मोदींना घाबरते म्हणून सामनामधून टीका करतात: ओवैसी
बांद्रा विधानसभेच्या पोटनिवडणुकी दरम्यान काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंना पराभूत करण्यासाठी आणि शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी एमआयएम’ने महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, मागील काही वर्षांपासून शिवसेनेवर टीका करायला जराही वेळ नसलेले एमआयएम’चे अध्यक्ष ओवैसी यांनी शिवसेनेवर दसरा मेळाव्या नंतर पुन्हा टीका करण्यास सुरुवात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्यावारीसाठी शुभेच्छा, जय श्रीराम! पण या प्रश्नांची उत्तर द्या? मनसे
शिवसेना भवनाबाहेर मनसेने उद्धव ठाकरेंना पोस्टरबाजीने शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्यासोबत १० प्रश्न सुद्धा विचारले आहेत आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्नं केला आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुखांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेक बाजूने टीका सुद्धा करण्यात येत आहे. त्याचाच फायदा मनसे सुद्धा उचलत आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ पुरावे; अयोध्या तो बहाणा है? निवडणुकीपूर्वी इथल्या उत्तर भारतीयांच्या मतांसाठी राजकारण: सविस्तर
आज दरवर्षी प्रमाणे शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित झाला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नेमकी कोणती नवी घोषणा करणार याची उत्सुकता असली तरी त्यातून काही भरीव निष्पन्नं होईल असं राजकीय विश्लेषकांना अजिबात वाटत नव्हतं. कारण मागील ४ वर्षांपासून राजीनामा नाट्याचे इतके प्रयोग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून झाले आहेत की त्यात प्रसार माध्यमांना सुद्धा रस उरलेला नाही. त्यामुळे पुन्हा भाषणात सत्तेला लाथ किंवा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा झाली तरी त्याला कोणीही गांभीर्याने घेईल असे वाटत नव्हते, असच एकूण चित्र आहे. परंतु ठरल्याप्रमाणे विकासाचं राजकारण फसल्याने लोकांना सत्ताकाळात आम्ही काय केलं याचं उत्तर द्यावं लागेल म्हणून अखेर तेच राम मंदिराचं भावनिक शस्त्र अपेक्षेप्रमाणे उपसण्यात आलं आहे आणि २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेतून कधी बाहेर पडणार? मला राजकारण शिकवायची गरज नाही: उद्धव ठाकरे
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आक्रमक झाली असून विकासापासून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी सत्तेत राहून केंद्र आणि राज्यातल्या सरकारला टीका करत असून आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या भावनिक विषयाला हात घातला आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आक्रमक झाली असून विकासापासून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी सत्तेत राहून केंद्र आणि राज्यातल्या सरकारला टीका करत असून आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या भावनिक विषयाला हात घातला आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आता का लाज वाटते? कामगारांचे पैसे खातांना लाज नाही वाटली? अंजली दमाणियांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सहार रोड येथे खंबाटा एव्हिएशनच्या कामगारांनी तीव्र आंदोलन पुकारलं होत. परंतु आज त्याला वेगळे वळण मिळालं आहे असच म्हणावं लागेल. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच इतर नेत्यांचा फोटो असलेले रावणाच्या अवतारातील प्रतिकृती लावली होती. त्यावर आज अंजली दमानिया यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोचरी टीका केली आहे. जर उद्धव ठाकरेंना या बॅनरची लाज वाटत असेल तर त्यांनी स्वत: हा बॅनर हटवायला हावे असे थेट आव्हानच ट्विट करत दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कायदा सुव्यवस्थेवरून शिवसेनेची सामना'तून फडणवीसांवर बोचरी टीका
शिवसेना आमदारावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीसांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सध्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचे सुद्धा अधोरेखित केले आहे. राज्यातील पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा तर पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर २ दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्याची गंभीर दखल शिवसेना पक्ष प्रमुखांनी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
खंबाटा एअरलाईन्स; देशोधडीला लागलेल्या कर्मचाऱ्यांचा उद्धव ठाकरे व विनायक राऊतांच्या नावाने शिमगा
खंबाटा एअर लाईन्स कंपनी कायमची बंद होऊन तब्बल २ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्यामुळे देशोधडीला लागलेले कामगार आज सुद्धा त्यांच्या हक्काच्या देयकांच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी कंपनीच्या ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी मुंबईतील सहार रोड परिसरात आंदोलन सुरु केले होते. तब्बल ५ दिवस चाललेल्या आंदोलनादरम्यान अन्यायग्रस्त कामगारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार विनायक राऊत यांच्या नावाने अक्षरशः सार्वजनिक शिमगा केला.
6 वर्षांपूर्वी -
नाहीतर भाजपचे 'रामनाम सत्य' होईल: उद्धव ठाकरे
भारतीय जनता पक्षाने लवकरात लवकर अयोध्येतील राम मंदिर उभारावे नाहीतर हिंदू समाज त्यांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही असा थेट गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने हिंदू जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोपही शिवसेनेने मुखपत्रातून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित
शिवसेनेच्या स्वबळाचा नारा आणि त्यामुळे भाजपची झालेली राजकीय गोची आता स्पष्ट दिसू लागली आहे. भाजपा शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही पक्षांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा आघाडीला होईल. त्यामुळे भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा आगामी निवडणुकीत पराभव होऊ शकतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या आढाव्याबाबत खासदारांनी मौन बाळगलं?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोतोश्रीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीला अनेक खासदारांनी हजेरी लावली खरी, परंतु त्याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे पक्ष प्रत्येक खासदाराच्या मतदार संघाचा आढावा घेतल्या शिवाय स्वबळ की एकत्रित निवडणुका याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आढावा बैठकीला येणारे खासदार कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
लोकशाहीत थापा मारून निवडणूक जिंकणं हा एक मार्ग बनला आहे: उद्धव ठाकरे
निवडणुकीत थापा मारण्याच्या भाजपच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून तोंडसुख घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष केलं आहे. तसेच निवडणुकांतील आश्वासने पूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जाहीर केली होती. मात्र निवडणूक आयोगाची ही घोषणा त्यांच्या मागील घोषणांप्रमाणे केवळ पोकळ आश्वासन ठरु नये, अशी टीका करत अप्रत्यक्षरित्या भाजपच्या खोट्या आश्वासनांना उजाळा देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाईंचा राजीनामा, केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर नाराज?
शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी तडकाफडकी आपला राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. प्रकाश देसाई केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा स्थानिक शिवसैनिकांमध्ये रंगली आहे. जिल्ह्यात उद्योग असून सुद्धा स्थानिक शिवसैनिक उपेक्षित असल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्ष केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गितेंना निवडणुकीच्या तोंडावर लक्ष केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कामालाही सुरुवात नाही आणि समाज माध्यमांवर 'करून दाखवलं' प्रोमोशन सुसाट
कालच मुंबई महानगरपालिका बांधत असलेल्या कोस्टल रोडच्या तब्बल १२,००० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली. मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोकापर्यंतच्या कामाला सुरवात होणं अजून प्रलंबित आहे. या कोस्टल रोडचे नियोजित बांधकाम पूर्ण होण्यास ४ वर्षाचा कालावधी लागणार असला तरी मुंबईत कधी सुसाट व्हायची ती होईल, परंतु, समाज माध्यमांवर प्रोमोशन मात्र सुसाट सुरु झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारिप-बहुजन आणि एमआयएम युती भाजपच्या मदतीसाठी आखलेला डाव : सामना
भारिप-बहुजन आणि एमआयएम युती भाजपच्या मदतीसाठी आखलेला डाव असल्याची टीका सामना मुखपत्रातून करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे आगामी निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. मुस्लिम आणि बहुजन ऐक्याची हाक देत आम्ही आमची आगामी निवडणुकीत दाखवून देऊ अशी घोषणा उभयतांकडून करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या वांद्रे शासकीय वसाहतीतील सभेनंतर शिवसेनेला ३ महिन्यांनी जाग, सभा आयोजित?
मुंबई वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली होती. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या हजारो कुटुंबांना हक्काच्या घरांसाठी झगडावं लागत आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहत ही मुंबई शहरातील मोक्याचे ठिकाणी असल्याने येथे अनेक राजकारणी डोळा ठेऊन आहेत आणि या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळतील की नाही याची हमी नाही.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल