महत्वाच्या बातम्या
-
संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार: निलेश राणे
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविण्याचे भाष्य केले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
YSR काँग्रेसला जवळ करून शिवसेनेला २०२४ मध्ये एनडीए'तून हद्दपार करण्याची योजना? सविस्तर
सध्या आंध्र प्रदेशात राजकीय समीकरणं बदलल्याने भाजपाला देखील YSR काँग्रेसचे वेड लागल्याचे चित्र आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विजयश्री खेचणाऱ्या भाजपने सध्या अल्पसंख्यांकांना जवळ करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. जगनमोहन यांनी राजकीय समीकरण बदलला असलं तरी आंध्र प्रदेशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे मतदार वायएसआर काँग्रेसच्या विजयाचा आधार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंना परदेश दौरा संपल्यावर शेतकऱ्यांची आठवण: अजित पवार
महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली असून, आतापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहे. त्यातच, परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण येत असल्याची टीका, एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. एनसीपी पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
खैरेंचा पराभव हा माझा पराभव; पण शिरूर व रायगडचा उद्धव ठाकरेंकडून उल्लेख नाही
शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा मानहानीकारक पराभव झाला. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना दौऱ्यावर आलेले असताना दिली. मात्र शिरूर लोकसभा आणि रायगड लोकसभा मतदार संघातील अनुक्रमे शिवाजी आढळराव-पाटील आणि अनंत गीते यांच्या बद्दल कोणतेही भाष्य केले नाही. कारण हे दोन नेते देखील पक्षाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांनी सेनेला मतं दिली; आता सेना नेत्यांची मुलं मराठी उद्योजकांकडून खंडण्या मागत आहेत
लोकसभा निवडणुकीत मतदाराने भाजपसोबत शिवसेनेच्या खासदारांना देखील कोणताही कर्तृत्व नसताना भरभरून मतदान केलं. मात्र आता त्याच मतदारांकडून शिवसेनेच्या आमदारांची मुलं खंडण्या मागत असल्याचे समोर आलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गोगावले असे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचे नाव आहे. मुंबईतीली भांडुप येथील वाहतूक व्यावसायिक राजेश शेटकर यांच्याकडे महाड एमआयडीसीत व्यावसाय करण्यासाठी विकास गोगावले यांनी खंडणीसाठी राजेश यांना धमकावल्याचा आरोप आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात पाणीबाणी! धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के पाणीसाठाच शिल्लक
महाराष्ट्रात भीषण पाणीसंकट ओढावलं आहे. मान्सून येत्या २ दिवसांत केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागण्यास अद्याप वेळ आहे. अशातच राज्यातील धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्राला येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी यावेळी राज्यातील धरणांमध्ये १८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मराठवाड्यात १४ टक्के पाणीसाठा होता परंतु या वर्षी मराठवाड्यात केवळ ०.७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवजड अपमानानंतर उद्धव ठाकरे संतापले; बेरोजगारीवरून मोदी सरकारला सुनावले
जुन्या वादाला विसरून भारतीय जनता पक्ष – शिवसनेने युती करत लोकसभा निवडणुकीत यश घवघवीत मिळवले. ४ दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराची आठवण करून देणाऱ्या शिवसनेने आज पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून महागाई आणि वाढत्या बेरोजगारी या मुद्यांवरुन मोदी सरकारचे कान टोचले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या ५ वर्षात दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते, परंतु तसे अजिबात झाले नाही. केवळ भाषणात शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. देशाची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या संकटात आहे. नवीन अर्थमंत्री यांनी मार्ग काढावे अशी मागणी शिवसेनचा मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
लाव रे ती फुसकी लवंगी! सेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग खातं आल्याने समाज माध्यमांवर खिल्ली
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवजड मालिका! सेनेच्या वाट्याला पुन्हा सामान्यांशी काहीच संबंध नसलेलं अवजड उद्योग खातं
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शहांना संरक्षण खातं दिलं तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल: उद्धव ठाकरे
काल नरेंद्र मोदी यांच्या बहुमतातील सरकारचा दिल्लीत शपथविधी समारोह पार पडला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय मधून मोदींवर पुन्हा स्थुतीसुमनांचा पाऊस पडला आहे. सामनात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, ‘देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत, मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही, मोदी-२ सरकारचा चेहरा मोदी हाच आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून निक्षून सांगितलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच. अमित शहा यांच्या येण्याने नरेंद्र मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रिपद मिळालं, 'लाव रे फटाके'! भाजपासाठी आठवले व उद्धव ठाकरेंची राजकीय किंमत एकच?
कालच नवी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि त्यात अनेक पक्षातील खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यात भाजप सरकार बहुमताने सत्तेत आल्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांचे चोचले पुरवले जाणार नाहीत हे त्या घटक पक्षांना आधीच ठाऊक असावं. त्यात मागील ५ वर्ष सत्तेला लाथ मारणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाताना दिसत आहेत, मात्र त्यांच्याकडे १८ खासदार असले तरी ते मोदींच्या नावावरच निवडून आले आहेत, हे सत्य असलं तरी ते मान्य करणार नाहीत हे वास्तव आहे. अर्थात शिवसेनेचा संपूर्ण प्रचार हा मोदींच्या नावावर झाला, त्यात गरजेप्रमाणे स्वर्गीय. बाळासाहेबांना देखील लक्षात ठेवण्याचा त्रास यांच्या स्टार प्रचारकांनी घेतला नाही हे सर्वांनी डोळ्याने पहिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करणे ही ईश्वरी योजनाच : उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकीत बहुमताने मिळालेल्या दणदणीत विजयानंतर नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधापदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील त्यांचा शाही शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामना संपादकीयच्या माध्यमातून मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक बनले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्वास वाटावा असे वातावरण निर्माण झाले व तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरला असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढवण्याची शक्यता
शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
6 वर्षांपूर्वी -
मोदी लाट नसताना 'मोदी-त्सुनामी' आली आणि या बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ठरले जाईंट किलर! सेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव
शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मोठ्या प्रतिष्ठेचा केला होता. त्यात राष्ट्र्वादीने आयत्यावेळी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांच्या विजयाचा निर्धार केला होता. विद्यमान खासदार आढळराव पाटील हे शिवसेनेतील दिग्गज नेते म्हणून परिचित असल्याने शिवसेनेने येथे प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळालं. या मतदारसंघात आढळराव पाटलांची स्वतःची अशी मोठी यंत्रणा असून त्यांना पराभूत करणे म्हणजे मोठं आव्हान असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
भाजप स्वबळावर सत्तेत आल्यास शिवसेनेची अवस्था पुन्हा रडकुंडीची होणार?
सत्तेत येण्यासाठी भाजपने मित्र पक्षांना जवळ केलं खरं आणि शिवसेनेने देखील भाजपाला आपल्याशिवाय गत्यंतर नाही असं वातावरण निर्माण केल्याचे चित्र होते. २०१४च्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेची अवस्था सत्तेत असून देखील नसल्यासारखीच असल्याचे पाहायला मिळाले. मात्र सध्या सुरु असलेले निकालाचे कल पाहता भाजप बहुमताने पुन्हा सत्तेत येईल अशी अशी चिन्हं आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वैद्यकीय प्रवेश: खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची आज राजभवनासमोर निदर्शने
राज्यात मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान पदवीधर मेडिकल प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. राज्यपालांनी राज्य सरकारच्या अध्यादेशावर अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये यासाठी मराठा विद्यार्थी आणि पालक राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लातूरमध्ये दुष्काळामुळे गावकऱ्यांवर शरिराला हानिकारक पाणी पिण्याची वेळ
मराठवाड्यात दुष्काळाने अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते आहे. त्यात लातूरमध्ये परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचं वृत्त आहे. पिण्याच्या पाण्याचा अनेक गावांमध्ये तुटवडा जाणवत असल्याने अनेक गावातील महिलांची वणवण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी शरीराला अपायकारक असलं तरी ते अशुद्ध पाणी पिण्याची वेळ अनेकांवर आल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांना जी धमक वाघिणीने दाखवली, ती धमक वाघ हयातीत दाखवणार नाही?
सध्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराअंती पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असले तरी, ममता बॅनर्जींच्या बेधडकपणाची चर्चा देशभर रंगली आहे. अमित शहांच्या प्रचार रॅलीनंतर पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संपूर्ण भाजपने पश्चिम बंगालमधील वातावरण शेवटच्या टप्प्यात दूषित करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला जो ममता बॅनर्जी यांनी धर्याने परतवून लावला.
6 वर्षांपूर्वी -
भर पावसाच्या काळात सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागणार
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्या आणि मतदान देखील पार पडलं आहे. दरम्यान, देशातील आता शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या दोन दिवसात संपेल आणि प्रतीक्षा असेल ती २३ तारखेला लागणाऱ्या लोकसभा निकालाची. मात्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच १०-१२ दिवसांनी पावसाळा सुरु होणार आहे. साधारण ४ महिन्यांचा पावसाळ्याचा सीझन संपताच साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN