19 April 2025 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांवेळी अज्ञातवासात गेलेले नेते महाराष्ट्रात प्रकटले

MP Manoj Tiwari, MNS Chief Raj Thackeray

कल्याण : गुजरातमधील एका घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरून संतापाच वातावरण झाल्यानंतर हजारो परप्रांतीयांवर हल्ले करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी रातोरात गुजरातमधून पलायन केलं होतं. मात्र या संपूर्ण घटनेनंतर भारतीय जनता पक्षातील आणि काँग्रेसमधील सर्व उत्तर भारतीय नेते अज्ञातवासात गेल्याचे दिसले होते.

महाराष्ट्रात आगपाखड करणारे सर्वांच्या सर्व उत्तर भारतीय नेते मूग गिळून शांत बसल्याचे महाराष्ट्राने पहिले होते. त्यात विषय थेट गुजरातशी संबंधित असल्याने भाजपमधील उत्तर भारतीय नेत्यांनी तोंड न उघडणारे नेते सध्या महाराष्ट्र विधानसभेत प्रचारासाठी प्रकटले असून, स्थानिक नेत्यांना धडा शिकविण्याचे भाष्य करत आहेत.

त्यात दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे गुजरातमधील ज्या आमदार अल्पेश ठाकोर याने उत्तर भारतीयांवर हल्ले घडवून आणले होते त्यांना गोड पेढा भरवत भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश दिला आहे. मात्र आजही मनोज तिवारी आणि इतर अन्य भाजप नेते तोंड उघडण्यास धजावत आहेत. त्यामुळे उत्तर भारतीय नेत्यांचे त्यांच्या समाजाप्रती असलेले बेगडी प्रेम पाहण्यास मिळत आहे.

महाराष्ट्रात प्रचारासाठी भाजपचे खासदार मनोज तिवारी प्रकटले असून, परप्रांतियांना मारहाण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, अशा शब्दात भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे. कल्याणमध्ये आयोजित केलेल्या सभेत तिवारींनी उत्तर भारतीय मतदारांना भोजपुरीतूनच संबोधित केलं.

‘मुंबई, ठाणे, वाशी, ऐरोलीमध्ये काही जणांना धरुन-धरुन मारहाण केली जाते. कारण ते उत्तर भारतीय आहेत. मी तर हिरो आहे. चित्रपट करायचो, गाणी गायचो. मात्र अचानक माझ्यामध्ये नेता संचारला. मी ठरवलं विरोध करायचा. रस्त्यावर उतरलो, विरोध केला आणि त्यानंतर माझा विजय झाला’ असं मनोज तिवारी म्हणाले.

‘शिवसेनेचे लोक आमच्यासोबत आहेत, पण शिवसेनेतून वेगळं होऊन बाहेर पडलेले जे लोक आहेत, मला त्यांचं नाव घेण्याची गरज नाही. सगळ्यांना माहित आहे ते कोण आहेत ते. प्रांताच्या नावाखाली जर ते आमचे ठेले आणि गाड्या उधळणार असतील, तर त्यांना धडा शिकवणार’ अशा शब्दात मनोज तिवारींनी राज ठाकरेंना निवडणुकीपुरतीचा पोकळ इशारा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या