17 April 2025 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

डोंबिवली: आ. राजू पाटील यांचं शहरातील प्रदूषण व अस्वच्छतेच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांना पत्र

CM Uddhav Thackeray, Dombivali, Kalyan Gramin

डोंबिवली: ‘मला कोणतीही टीका करायची नाही. पण मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. प्रदुषणाला आणि अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत याबाबत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.

राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख होती. आता ही ओळख राहिली नसून हे शहर आता प्रदूषणाचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी केली आहे.

‘केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनीही काही वर्षांपूर्वी डोंबिवलीला बकाल शहर असे संबोधून देखील इथल्या महापालिका अधिकाऱ्यांनी त्या नाराजीच्या वक्तव्यातून कसलाच बोध घेतला नाही, ही या शहरांमधील नागरिकांची शोकांतिका असल्याचे पाटील राजू म्हणाले. एमआयडीसीच्या अस्वच्छता, नाले तुंबणे, कचऱ्याचे ढिग, दर्प याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत असूनही यंत्रणा मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात वर करत आहेत. त्यामुळेच इतर संस्थांना पुढे येऊन नालेसफाई करावी लागत आहे, असं म्हणत राजू पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

‘या ठिकाणी बहुतांशी भाग उद्योग, निवासी असा आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावत आहेत. तसेच कामगारांच्या स्वास्थाचा प्रश्न जैसे थेच असून तो दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या सर्व बकालीला आणि प्रदूषणाला येथील दोन्ही यंत्रणांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी अभियंते, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, महापालिकेचे स्वच्छता अधिकारी आदी सगळयांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करावी असे पत्रात म्हटले आहे.

तत्पूर्वी, आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली मधील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अनेक विकास कामांना हात घातला आहे आणि ते तडीस घेऊन जाण्यास प्रशासकीय पातळीवर मोठी धावपळ करताना दिसत आहेत. त्यासाठी कल्याण डोंबिवलीतील मनसेची संपूर्ण टीम त्यांच्यासोबत पाठपुरावा करताना दिसत आहे. आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा घेतलेल्या अजून एका महत्वाच्या कामाला प्रशासन पातळीवर गती मिळाली आहे.

कल्याण रेल्वेस्थानक ते लोकग्रामला जोडणारा पादचारी पूल मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. सदर पूल महापालिकेच्या स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत उभारला जाणार आहे. या पुलासंदर्भात महापालिका, स्मार्टसिटीचे अधिकारी आणि रेल्वेप्रशासन यांची आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे. कारण या पुलाच्या उभारणीसाठी एकूण ३८ कोटी ५७ लाख निधी मजूर करण्यात आल्याने स्थानिक लोकांची मोठी मागणी पूर्णत्वाला येणार आहे.

 

Web Title:  MNS MLA Raju Patil wrote a letter to CM Uddhav Thackeray over Dombivali Pollution issue.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या