25 April 2025 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा Horoscope Today | 25 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रावरचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रावरचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 25 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | इरेडा शेअरबाबत महत्वाचे संकेत; मल्टिबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

पालघर: पुराचा धोका! मुंबई पालिकेने धोक्याचा सायरन वाजवला; पालघरवासीयांना ‘जागते रहो'

Thane, Palghar, Heavy Rain

पालघर : मुंबईकरांना पहिले काही दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने मुंबईमध्ये जरी थोडी उसंत घेतली असली तरी पावसाने आता मोर्चा मुंबई नजीकच्या शहरांकडे वळवल्याचे दिसत आहे. ठाणे, पालघर जिह्यातील तानसा आणि वैतरणा ही दोन्ही मुख्य धरणे ओसंडून वाहू लागली असून आता कधीही पुराचा धोका संभवतो असे सूतोवाच प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे नद्यांनी देखील धोक्याची पातळी गाठली असून कोणत्याही क्षणी पूर येऊन परिसरातील तब्बल ७५ गावांची घर देखील पाण्याखाली बुडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान धोक्याचा सायरन मुंबई महापालिकेने वाजवला असून तातडीने ठाणे, पालघरवासीयांना ‘जागते रहो’चा थेट इशारा दिला आहे. वैतरणा नदीवरील शहापूर तालुक्यात खर्डी गावाजवळ मोडकसागर धरणाच्या पाण्याची पातळी आज १६०.८४२ मी. टीएचडी इतकी मोजली गेली आहे. धरण ओसंडून वाहण्याची पातळी १६३.१४९ मी. टीएचडी असल्याने आणि परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मोडकसागर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शहापूर तालुक्यातील तानसा गावाजवळील तानसा धरणात पाणीसाठा १२६.७८१ मी. टीएचडी झाला असून १२८.६२ मी. टीएचडीपर्यंत पातळी गाठताच हे धरणही ओसंडून वाहण्याच्या तयारीत आहे.

तानसा व वैतरणा या दोन्ही धरणांनी व नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असल्याने ठाणे व पालघर जिह्यातील तब्बल ७५ गावांना पुराचा धोका आहे. यामध्ये वैतरणा नदी परिसरातील ४२ गावे तर तानसा नदी परिसरातील ३३ गावांचा समावेश आहे. या गावांच्या यादीसह मुंबई महापालिकेने ठाणे, पालघर जिल्हाधिकाऱ्यांसह भिवंडी, शहापूर, वाडय़ाचे तहसीलदार तसेज आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. कैतरणा आणि तानसा धरणाखालील आणि नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना पुराची कल्पना देऊन सावध राहण्याचे निर्देश द्यावेत असे पत्र पालिकेचे कार्यकारी अभियंता र. श. जोहरे यांनी संबंधित यंत्रणांना पाठकले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Thane(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या