महत्वाच्या बातम्या
-
धुळे-नंदुरबार | भाजपचे उमेदवार अमरीश भाई पटेल यांचा ३३२ मतांनी विजय
धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मोठा फरकाने बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अमरीश पटेल यांनी ३३२ मतं घेत एकतर्फी विजय मिळवला आहे. ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ४ मतं बाद झाली तर ३३२ मतं अमरीश पटेल यांनी मिळवत मोठा विजय मिळवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्रात पक्ष मेळावे | खडसेंपुढे भाजपच्या संकटमोचकांची संकटं संपेना
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील जाहीर प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जोरदार पदाधिकारी मेळावे आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा पक्ष मेळावा पार पडला. दुसरीकडे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना काल रावेरमध्ये राजकीय धक्के दिल्यानंतर अजूनही धक्के सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप सोडणाऱ्यांची दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही | गिरीश महाजन
भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार तर सोडा, एकही निष्ठावंत कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही, असा विश्वास आमदार गिरीश महाजन यांनी चोपडा येथे आयोजित शुक्रवारी भाजपच्या बैठकीत व्यक्त केला. जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश | खासदार सुनेची भाजपच्या बैठकीलाच दांडी
भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) जळगावात पोहचले आणि त्यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं होतं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
5 वर्षांपूर्वी -
नाथाभाऊंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भाजप उ. महाराष्ट्रात अनाथ होणार | बच्चू कडूंची प्रतिक्रिया
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आपली कन्या रोहिणी आणि निवडक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
5 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या हालचालींमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचा अलर्ट | महाजनांच्या घरी बैठक
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणारा हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये खळबळ उडाली. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या घरी गुप्त बैठक सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
अखेर खडसे पवार भेटीच्या वृत्तावर स्वतः शरद पवारांनी खुलासा केला
पक्षांतर्गत अन्याय झाल्यामुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. खडसे आज बुधवारी मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांच्या भेटीच्या शक्यतेचा खडसे यांनी इन्कार केला असला तरी राजकीय गोटात खडसेंची मुंबईवारी चर्चेचा विषय ठरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी
केंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी लादून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. मोदी सरकार समाज माध्यमाचा मोठय़ा प्रमाणात आधार घेऊन देशभरातील शेतकरी, शेती विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. परंतु, सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर, निर्यातबंदी विरोधात शनिवारपासून शेतकरी समाज माध्यमांवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी अजितदादांसोबत ३ दिवस सरकार चालविले | त्यामुळे ते त्यांना लक्ष करणार नाहीत
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा प्रचारात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन जनतेला आवडलं की नाही - एकनाथ खडसे
भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात एकाकी पडल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकारी समितीमध्ये देखील त्यांना स्थान देण्यात आलं नसल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात मागील काही काळात त्यांना भाजपच्या राज्यांसंबंधित निर्णयात सामील देखील करून घेतलं जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. केंद्रात जस मोदी आणि अमित शहा यांचा आवाज चालतो, तसा राज्यात फडणवीस यांचा आवाज चालतो असं भाजपच्या अंतर्गत गोटात देखील छुप्या आवाजात मान्य केलं जातं.
5 वर्षांपूर्वी -
शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या वेळी भाजपाला पाझर फुटला नाही | अनिल गोटे
सुशांत सिंह राजपूत याच्या हत्येची अथवा आत्महत्येच्या घटनेने भाजप नेत्यांना झोप येत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच भाजप नेते रात्रंदिवस सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अस्वस्थ झाले आहेत, अशी सहृदयता अनन्यसाधारण आहे. सुशांत सिंह बिहार राज्यातील निवासी आहे. त्यांच्या पालकांनी त्याला राज्यातील भाजप नेत्यांच्या विश्वासावरच मुंबईत पाठवले होते. आपल्या पालकत्वाच्या कर्तव्यात कसूर होता कामा नये यासाठी सुरू असलेली घालमेल अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शांत व्हायला हरकत नाही, अशी खोचक टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वीज बिल झटका | सामान्य ग्राहक, नेते मंडळी ते सेलिब्रेटी अशी सर्वांचीच लूट
महावितरणच्या वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह दिग्गज लोकांना देखील बसला आहे. आता याचा फटका भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. मुक्ताईनगर येथील त्यांच्या राहत्या घराचे बिल एक लाखाहून अधिक रकमेचे आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. महावितरणने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नये, बिलांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी त्यांनी आता राज्य सरकारकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी मुंगेरीलालची सुंदर स्वप्नं पाहावीत - गुलाबराव पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केल्यापासून महाराष्ट्रातील सरकार सुद्धा पडणार अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. मात्र स्वतः फडणवीसांनी देखील आम्हाला सरकार पाडण्यात काहीच रस नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यानंतर देखील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींकडून प्रतिकिया येतंच आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या विरोधी गटातील अनेक नेते त्यांना ‘टरबुज्या’ म्हणायचे, विरोधकांची काय चूक
भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत होता. त्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही असं विधान त्यांनी केलं होतं. ही वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले होते. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र तीव्र झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला महारोग असं मी म्हणणार नाही- अनिल गोटे
भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता वाजले की बारा; भाजपने खडसेंच बंड तात्पुरतं शमवलं अन राज्यसभेला पुन्हा गुंडाळलं?
महाराष्ट्रातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून गुरुवारी त्याने नाव जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलानुसार भाजपच्या वाट्याला ३ जागा येत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला: उद्धव ठाकरे
सिंचन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने आयोजित पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्र पुरस्कार सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
जळगाव: ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला असून सांगली जिल्ह्यात कार चालकाचे निंयत्रण सुटल्याने ही कार विहिरीत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातात एकूण १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने रविवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. दोन्ही अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पुन्हा असभ्य भाषा; काय म्हणाले नेमकं?
शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्यावरुन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आगपाखड करताना आक्रमक पवित्रा घेतला. ‘सालेहो सेटींग करतात, तेही आमचीच मते खाऊन. भोगावे लागले इथेच’, असे वक्तव्य त्यांनी केले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थकाला बेदम मारहाण; दानवे आणि महाजनांसमोर तुफान राडा
भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी असलेले रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA