महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांच्या फेसबुकवर माहिती देणारी एक पोस्ट टाकली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलगाव: शस्त्र भांडाराजवळ स्फोट; ६ ठार
येथील पुलगावमध्ये असणाऱ्या भारतीय लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ जुनी स्फोटकं निकामी करत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात तब्बल ६ जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या भीषण स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये काही स्थानिक नागरिकांचा सुद्धा समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच जखमींचा आकडा अजून वाढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण स्फोटामुळे आसपासच्या परिसरात जोरदार हादरे बसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर भाजप: खून प्रकरणात जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला उपाध्यक्ष पद बहाल
एका हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नरेंद्र सिंह दिगवा उर्फ डल्लू सरदार याला भाजपाने उत्तर नागपूर मंडळाचा झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष पद बहाल केले आहे . विशेष म्हणजे शहरभर त्याच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक झळकावले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रपूर: जंगलातूनच रेल्वे रूळ टाकल्याने रोज अनमोल प्राणी मरत आहेत
आधीच देशभरात वाघांची संख्या झपाट्याने घटत आहे आणि त्यात अशा घटनांनी असलेले वाघ तसेच इतर प्राणी सुद्धा रोज प्राण गमावत आहेत. काही दिवसांपूर्वी अवनी वाघिणीला नरभक्षक घोषित करून विशेष मोहीम राबविण्यात आली आणि ठार करण्यात आले. परंतु मनुष्य प्राणी त्यांच्या अस्तित्वावर घाला घालत आहे यावर पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
अवनी वाघिणीचे बछडे सुखरूप, जंगलात रस्ता ओलांडताना दर्शन
यवतमाळच्या जंगलात ३ नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला शार्प शुटर असगर याने गोळ्या घालून ठार मारले होते. परंतु, अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या २ बछड्याचे दर्शन अनेक दिवसांपासून झाले नव्हते. दरम्यान, अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर जंगलात बेपत्ता आणि भुकेल्या असलेल्या तिच्या २ बछड्यांचे अखेर गुरुवारी यवतमाळमधील जंगलात रस्ता ओलांडताना दर्शन झाले.
7 वर्षांपूर्वी -
अवनी'च्या हत्येनंतर? नाही! राज ठाकरेंची ती तळमळ जुनी आहे: सविस्तर
अवनी वाघिणीला नरभक्षक ठरवून तिला ठार मारण्यात आल्याने देशभर संतापाची लाट उसळली असताना अनेक स्तरावरून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मनुष्य प्राणी स्वतःच्या सीमारेषा ओलांडून जंगलांपर्यंत वास्तव्य पसरवू लागल्याने मनुष्यावर प्राणी असे हल्ले करतंच राहतील हे सत्य आहे. त्यासाठी यवतमाळचं जंगल कशाला अगदी मुंबईसारख्या शहरातील संजय गांधी नॅशनल पार्कच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले झालेले पाहायला मिळत आहे. परंतु, त्यात प्राण्यांनाच नरभक्षक ठरवून ठार केले जाते. परंतु, तस्करीसाठी मनुष्य प्राणी सुद्धा अधिकाऱ्यांच्या संगनमताने जंगलात शिरून याच वाघांची हत्या करून त्यांची कातडी आणि नखे लाखो-करोडो रुपयांना विकून स्वतःचे खिसे भरतात हे सुद्धा वास्तव आहे. परिणामी देशात वाघांची संख्या झपाटूणे कमी होत असून तो देशातील एक दुर्मिळ प्राणी होईल अशी परिस्थिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
त्या जमिनीसाठी अवनीची हत्या? अनिल अंबानींसाठी देश विकायला काढला आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ येथे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन फडणवीस सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार करण्याचा निर्णय योग्य नव्हता असं म्हटलं आहे. केवळ पुतळे उभारुन देशभरात वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
वनविभाग अव्नीचे शत्रू नाही: सुधीर मुनगंटीवार
रविवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अव्नी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिल्याबद्दल एकावर एक ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर, आम्ही अव्नी वाघिणीला नाईलाजाने मारल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीयमंत्री मेनका गांधी यांना प्रतिउत्तर देताना म्हटले आहे. त्यामुळे मनेका गांधी यांना अजून सविस्तर माहिती माहित नाही असं वनमंत्री म्हणाले. दरम्यान, वाघिणीला मारण्याचा निर्णय हा राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने घेतला आहे. तसेच वाघिण काय वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची शत्रू नव्हती, असं सुद्धा म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
अवनीला भेकडासारखे मारले, शिवसेनेचं टीकास्त्र
दोन दिवसांपूर्वी अवनी या टी-१ वाघिणीला महाराष्ट्र वन खात्याने विशेष मोहीम राबवून ठार केल्यानंतर संपूर्ण देशात टीकेचा सूर उमटला आहे. अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. आता शिवसेनेने सुद्धा अवनीवरून भाजप आणि वनखात्याविरोधात विरोधात आवाज उठवला आहे. ‘ज्या महाराष्ट्रात माणसं सुद्धा नीट जगू शकत नाहीत, त्याच राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? पण अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात उंदरांना सुद्धा वाघाचे बळ येते’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपवर आणि वन खात्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील: आमदार बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकार जर असंच असंवेदनशील राहिल्यास दंगली उसळतील असा सज्जड इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मुक्काम मोर्चादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आमदार बच्चू यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू, अशी धमकी सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नरभक्षक टी-१ वाघीण ‘अव्नी’ अखेर ठार
कोणताही ठोस पुरावा नसताना थेट ‘नरभक्षक’ ठरवून टी-१ ‘अव्नी’ वाघिणीला शोधपथकाने अखेर ठार मारले आहे. या टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी मागील ४७ दिवसांपासून वनविभागाची शोध मोहीम सुरू होती. काल रात्री वाघिणीचा शोध घेणाऱ्या पथकावर हल्ला केल्याच्या बहाण्याने तिला गोळी झाडून ठार करण्यात आले असा आरोप प्राणिमित्रांनी केला आहे. बोराटीच्या जंगलातील नाल्यालागत राळेगण परिसरात हे हत्याकांड घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतमजुराच्या मुलीची सी.ए. होण्याची इच्छा, मनसे करणार तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौऱ्यादरम्यान धामणगाव गढी (ता. अचलपूर, जि. अमरावती) येथील कु.एेश्वर्या तोटे या विद्यार्थीनीची कैफियत ऐकून घेतली होती. एेश्वर्या तोटे ही सध्या बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे, परंतु शेतमजूर असलेल्या आई-वडिलांची मुलगी असलेल्या या मुलीची सी.ए. होण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ती तीच सी.ए. होण्याचं पुढचं स्वप्नं पूर्ण करून शकत नाही, हे राज ठाकरेंना तिच्याशी संवाद साधताना ध्यानात आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांनी घेतली शहीद जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून पक्ष विस्तारासोबत ते अनेक समाजसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर सुद्धा भर देत आहेत. दरम्यान, काल त्यांनी शहीद जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ढोपे कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या स्वागताला वणी मतदारसंघात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
मेळघाट; चिलाटी या दुर्गम भागातील मैत्री या सेवाभावी संस्थेच्या केंद्राला राज ठाकरे यांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या १० दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी मेळघाटातील कुपोषण आणि सार्वजनिक आरोग्य व ग्रामीण विकास या विषयांवर रचनात्मक कार्य करणाऱ्या मैत्री या सेवाभावी संस्थेच्या चिलाटी या दुर्गम भागातील केंद्राला राज ठाकरे यांनी भेट दिली. या संस्थेचं केंद्र चिखलदरा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे जवळपास ४० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
7 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक, पश्चिम विदर्भातील वणी आणि हिंगणघाट मनसे जिंकण्याची शक्यता: सविस्तर
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांनी जोरदार धक्का दिला घेऊन स्थानिक कार्यकारिणी बरखास्त केली. याचवेळी शहर अध्यक्ष म्हणून पप्पू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहर कार्यकारिणी येत्या काही दिवसांनी घोषित करण्यात येईल असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाना उद्दट वागतो, पण तो असं काही करेल हे मान्य नाही: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष सध्या १० दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान काल त्यांची अमरावती येथे प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर ‘मी-टू’च्या माध्यमातून जे आरोप करण्यात आले त्यावर राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर देताना म्हटलं की, नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत नाना पाटेकरांनी खंबीर पाठिंबा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची आज संध्याकाळी अमरावतीत प्रकट मुलाखत; भव्य नियोजन
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. दरम्यान आज ७:३० वाजता पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना होणार आहेत. आज सायंकाळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अमरावती एक्सप्रेसने रवाना होणार आहते. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
भारत-बंद वेळी स्वतःचा मतदारसंघ ठप्प करू न शकणाऱ्या निरुपमांची महाराष्ट्र-ठप्प करण्याची भाषा
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात रान पेटलेल असताना, त्याला संधी म्हणून निरुपम पाहत असावेत म्हणून नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलण्याची संधी मिळताच संजय निरुपम यांनी महाराष्ट्रात प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या मतदार संघात उत्तर भारतीयांनी साडेतीन लाखापेक्षा अधिक मतांनी नाकारलेले संजय निरुपम सध्या स्वतःची मतपेटी वाढविण्यासाठी आणि उत्तर भारतीयांचा मसीहा असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी मिळताच केविलवाणे प्रयत्नं करत आहेत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK